ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना व्हायरस संदर्भातील माहिती देण्यासाठी केंद्र सरकारकडून ‘आरोग्य सेतू’ नावाचे एक ॲप आणले आहे. हे ॲप सर्व खाजगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. या ॲप बाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ही एक प्रकारे लोकांवर पाळत ठेवण्याची सिस्टीम आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
ते म्हणाले, या ॲप द्वारे लोकांची खासगी माहितीची चोरी आणि त्यांच्या खाजगीपणाचा भंग होऊ शकतो. हे तंत्रज्ञान आपल्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे पण, या भीतीदायक वातावरणाचा उपयोग करून लोकांच्या परवानगीशिवाय त्यांच्यावर माग ठेऊ नये, असं म्हटले आहे.
याला उत्तर देताना भाजपचे केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद म्हणाले की, आरोग्य सेतू ॲप शक्तिशाल ॲप असून लोकांची सुरक्षा करत आहे. ज्या लोकांनी आपले पूर्ण आयुष्य दुसऱ्यांवर लक्ष ठेवण्याात घालवले, त्यांनाााा तंत्रज्ञानाचा वापर चांगल्यासाठी ही करता येतो, हे कुठे माहित असणार असा टोलाही त्यांनी राहुल गांधी यांना लगावल आहे.
पुढे ते म्हणाले, जे भारताला समजू शकत नाही त्यांचे ट्विटर बंद केले पाहिजे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.