वाळपई / प्रतिनिधी
सत्तरी तालुक्मयातील केरी पंचायत क्षेत्रांमध्ये येणाऱया केळावडे गावात मध्ये मोठय़ा प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन होत आहे सध्या सदर उत्पादन फलोत्पादन महामंडळातर्फे उचलण्यात येत असली तरी त्यांना प्राप्त होणाऱया तुलनात्मकदृष्टय़ा कमी असून त्यात वाढ करण्याची मागणी भाजी उत्पादकांनी केली आहे .त्याचप्रमाणे कोरोना रोगाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सरकारतर्फे लॉकडाऊन आल्यानंतर या भाजी उत्पादकांना मोठय़ा प्रमाणात नुकसान सहन करावे लागले असून यामुळे सरकारने याची गंभीर दखल घेऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी भाजी उत्पादकांनी केलेली आहे.
याबाबतची माहिती अशी की सध्या गोव्यामध्ये लाँकडाऊन करण्यात आल्यामुळे मोठय़ा प्रमाणात भाजीचा तुटवडा भासत आहे. याला मोठय़ा प्रमाणात दिलासा म्हणून सत्तरी तालुक्मयातील केळावडे या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात उत्पादित होणारा भाजीपाला राज्याच्या फलोत्पादन महामंडळातर्फे उचलण्यात येत आहे. यामुळे महामंडळातर्फे खास वाहने गावांमध्ये पाठवून भाजी उत्पादकांची भाजी एकत्र करून ती फुलत्पादन महामंडळाच्या वेगवेगळय़ा आस्थापनात पाठविण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. यामुळे भाजी उत्पादकांनी समाधान व्यक्त केले असले तरी महामंडळातर्फे पाठविण्यात येणारे वाहन तीन दिवसांनी न पाठविता दररोज पाठविण्यात यावे अशा प्रकारची मागणी भाजी उत्पादकांनी केली आहे.
यामुळे दोन दिवस उत्पादित होणारी भाजी घरामध्ये साठा करून ठेवावा लागत असून यामुळे नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दररोज फलोत्पादन महामंडळाने वाहने गावांमध्ये पाठवावीत अशा प्रकारची मागणी भाजी उत्पादकांनी केलेली आहे. त्याचप्रमाणे सध्या या dभ्गांमध्ये मोठय़ा प्रमाणात भेंडी काकडी टोमॅटो अशा प्रकारची भाजी उत्पादन होत आहे. बाजारामध्ये भेंडीचा दर प्रतिकिलो 60 असून सध्या तरी याभाजी उत्पादकांना भेंडीचा दर प्रति किलो 35 रुपयांनी भेटत आहे. या दरांमध्ये वाढ करून समाधानकारक दर द्यावा अशा प्रकारची मागणी भाजी उत्पादकांनी केलेली आहे. यंदाचा मौसम भाजी उत्पादकांसाठी अत्यंत नुकसानीत गेला असून कोरोना रोगाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर भाजी उत्पादकांना नुकसानीला सामोरे जावे लागलेले आहे. यामुळे सरकारने भाजी उत्पादकांना नुकसानभरपाई देण्याच्या दृष्टिकोनातून गांभीर्याने विचार करावा अशा प्रकारची मागणी भाजी उत्पादकांनी केलेली आहे.
यासंदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार गेल्या चार दिवसांपासून मोठय़ा प्रमाणात भेंडीचे उत्पादन झाले असून जवळपास दोन टनांपेक्षा जास्त भेंडीचे उचल महामंडळाच्या मार्फत करण्यात आलेले आहे. यामुळे या भागामध्ये मोठय़ा प्रमाणात उत्पादन होत असल्याचे सिद्ध झालेले आहे. त्याचप्रमाणे या भागातील जमिनीमध्ये पोषकतत्वे असल्यामुळे भाजी उत्पादनासाठी अत्यंत अनुकूल असे वातावरण असून यामुळे या भागातील भाजी उत्पादनात मोठय़ा प्रमाणात वाढ होत असल्याचे समोर आले आहे. सरकारने या भाजी उत्पादकांना चांगल्या प्रकारे सहकार्य व सहयोग दिल्यास येणाऱया काळात या गावाला भाजी उत्पादनाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आधार प्राप्त होणार असल्याचे समजते.