- आज संध्याकाळी 6 ते सोमवारी सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी
ऑनलाईन टीम / जयपूर :
देशात कोरोना विषाणू अक्षरशः थैमान घालत आहे. अशा परिस्थितीत अनेक राज्यांनी अनेक कडक निर्बंध लादले आहेत. त्यातच आता राजस्थान सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात वाढत असलेली रुग्ण संख्या लक्षात घेत राज्यात आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी 5 वाजेपर्यंत कर्फ्यूची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले की, कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेत शुक्रवारी संध्याकाळी सहा ते सोमवारी सकाळी पाच वाजेपर्यंत कर्फ्यू जारी करण्यात आला आहे. आपल्या सर्वांना आवाहन आहे की, कर्फ्यू दरम्यान, सरकारला सहकार्य करावे आणि कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे.
पुढे ते म्हणाले, कर्फ्यू दरम्यान, पहिल्या पासूनचालू असलेल्या नाईट कर्फ्यूत सूट देण्यात आलेल्या सेवांमध्ये फळे, भाजीपाला, दूध, एलपीजी गॅस आणि बँकिंग सेवांचा देखील समावेश करण्यात आला आहे.
पुढे ते म्हणाले, पहिल्यांदा 17 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे अधिक रुग्ण आढळून येत होते. मात्र, मागील काही दिवसात सर्वच जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. आता परदेशात कोरोनाचे 6,658 नवे रुग्ण आणि 33 मृत्यू झाले आहेत. त्यामुळे आजपासून विकेंड कर्फ्यू जारी करण्यात आला आहे.
जर वेळेवरच कठोर निर्णय नाही घेतला तर येथील परिस्थिती देखील दुसऱ्या प्रदेशांप्रमाणे बिकट होईल, त्यामुळे माझे सर्व नागरिकांना आवाहन आहे की, सर्वांनी एकजूट या कर्फ्यूला सहकार्य करावेे, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.