जगाला कोरोनावरील लसीकरणाचे वेध लागले असताना या कोरोना व्हायरसमध्ये म्युटेशन (उत्परिवर्तन) झाल्याने जगभरात चिंतेचे व संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. कोणत्याही विषाणूंच्या जनुकीय (क्रोमोसोम्स) आराखडय़ात अनेक बदल झाल्याचे यापूर्वीही वैज्ञानिकानी अनुभवले आहे. स्वाइन फ्लूच्या वेळीही अशाच प्रकारचे व्हायरसमधील बदल पहावयास मिळाले होते. कोरोना विषाणूंना एक बाहेरील मेदाचे किंवा फॅटचे आवरण असते आणि आत त्यांचा जीनोम असतो. विषाणूचा जीनोम आरएनएचा बनलेला असतो. कोरोना व्हायरस म्हणजे एक प्रकारचे अमायनो ऍसिड (प्रोटीन) आहे. एका क्रमाने जीन्स लावलेले सारे मिळून एक हा आरएनए व्हायरस तयार होत असतो. याच्या क्रमात मागील पुढे व पुढील मागे असा बदल झाला तर त्याला म्युटेशन अथवा उत्परिवर्तन असे म्हणतात.
गेल्या वर्षभरात कोरोनाचे कितीतरी वेगवेगळे प्रकार समोर आलेले आहेत. मुळात कोणताही विषाणू एका ठरावीक कालावधीनंतर स्वत:ची रोग निर्माण करण्याची तसेच वाढविण्याची ताकद कमी करतो कारण त्यालाही त्याचे अस्तित्व टिकवून ठेवायचे असते.
सध्या नवीन बदल झालेला व्हायरस इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा देशात प्रामुख्याने आढळला आहे. कोरोना व्हायरसमध्ये आजपर्यंत 23 जिन्समध्ये म्युटेशन झाले आहेत, त्यापैकी 8 म्युटेशन हे कोरोना व्हायरसच्या शिंगामध्ये झाले आहेत. 501RBD जीन्समध्ये बदल झाल्याने, शिंगे (spike) मधील रचनेत बदल होऊन N ऐवजी Y म्यूटेशन झाल्याने व त्याची R-Value वाढल्याने तो आता पहिल्यापेक्षा 70% जास्त प्रसार करणारा संसर्गजन्य झाला आहे. कोरोना शिंगा (Spike protein) मधील बदलामुळे कोरोना वायरस आता सहज ACE 2 receptors मार्फत दुसऱया पेशीत प्रवेश करणे सोपे जाणार आहे. त्यामुळे त्याचा संसर्ग वाढणार आहे. यामुळे लहान मुलांनासुद्धा आता कोरोना होऊ शकेल. एस-जीन बदलल्याने
rt-pcr -S-gene टेस्ट तपासणी किटमध्ये बदल होऊ शकतो. नवीन व्हायरसमुळे RT-PCR मधील Ct-value कमी असेल. कोरोनाच्या पेशीत जरी बदल झाला असला तरी त्याच्या मूळ स्वरूपात जास्त फरक झाला नसल्याने हा फार धोकादायक ठरणार नाही. या विषाणूची रोग निर्माण करण्याची आणि रोग वाढविण्याची क्षमता जुन्या विषाणूएवढीच आहे, त्यात जास्त काही फरक नाही. सुमारे एक वर्षानंतर कोरोना व्हायरस रचनेमध्ये नुकताच फरक झाला आहे. नवीन व्हायरसची तीव्रता, अडचणी, मृत्युदर अजून काही दिवसानंतर समजेल.
याचे संक्रमण सध्या इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या देशात खूप मोठय़ा प्रमाणात झाले असले तरीही यामध्ये सिरीयस होण्याचे प्रमाणही खूप कमी आहे व मृत्यु दरही कमी आहे. नवीन संसर्गामुळे होणाऱया कोविडमध्ये देण्यात येणारी ट्रीटमेंट ही पहिल्या ट्रीटमेंट प्रमाणेच लागू पडते. त्यामुळे फार चिंतेचे कारण नाही. सध्या भारतात कोविड रुग्ण बरे होण्याचा दर (रिकव्हरी रेट) हा जवळपास 96.36% आहे. हा जगात सर्वात जास्त आहे. तसेच देशात कोविड मृत्यूचे प्रमाणही 1.4% म्हणजे खूप अत्यल्प आहे, त्यामुळे ही साथ जरी आली तर त्यावर चांगला इलाज होऊन रुग्ण ठीक होतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लसीकरणावर या विषाणूच्या प्रकाराचा काहीही फरक पडणार नाही, निघालेली लस या नवीन प्रकारावरही तेवढीच परिणामकारक असेल. जरी पुन्हा मोठी साथ आली तरी समाजामध्ये हर्ड इम्युनिटीसुद्धा तयार होईल व शरीरात अँटीबॉडिजही बनतील.
लवकरच भारतात मिळणारी व तयार झालेली लस या नवीन प्रकारच्या व्हायरस वरही काम करेल यात शंका नाही. पूर्वी झालेल्या कोरोना रुग्णांना याचे परत रिइन्फेक्शन व्हायची संभावना अत्यंत कमी आहे.. त्यांच्यामध्ये तयार झालेल्या अँटीबॉडीज, इम्युनिटी, टी-सेल, बी-सेल, मोनोसाईट्स, मायक्रोफेजेसमुळे व पूर्वीची प्रतिकारशक्ती परत कामास येईल यात शंका नाही. जर हा व्हायरस भारतात आला तर जास्त संसर्गजन्य असल्याने दुसरी मोठी लाट धोक्मयाची होऊ शकते. पण आपण त्याचा मुकाबला करण्यास सज्ज आहोत. सध्या भारताने हा नवीन बदल झालेला वायरस (New variant) आपल्या इकडे येऊ नये म्हणून कठोर उपाय योजना आखल्या आहेत. संसर्ग असणाऱया देशातून येणाऱया प्रवाशांना बंदी, तसेच आलेल्यांना 14 दिवस क्वॉरंटाईन सक्तीचे केले आहे. विमानतळावरच योग्य ती काळजी घेणे हाच सर्वोत्तम उपाय राहिल.
समजा ही साथ भारतात पसरली तर हाय रिस्क, वयस्कर, कोमॉरबिड रुग्णाना अमेरिकेतील रिजनरॉन व ईलायलिली कंपनीने बनवलेल्या ‘मोनॉक्लोनल अँटीबॉडीजचे’ डोस भारतात परवाना देऊन, ही साथ आटोक्मयात आणण्यास मदत होऊ शकते. वरील अँटीबॉडीज डोस 80 टक्के गुणकारी आहेत असे संशोधनात सिद्ध झाले आहे. याच्या वापरास अमेरिकेत परवानगी देण्यात आली आहे. एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की, कितीही काळजी घेतली तरी हा कोरोनाचा नवीन प्रकार (व्हेरिएंट) भारतात येणारच. ‘काही होणार नाही’ म्हणून बिनधास्त राहणेही चुकीचेच. हलगर्जीपणा चालणार नाही कारण याचा संसर्गाचा वेग खूप जास्त आहे. गेल्या वर्षभरात आपण जवळच्या खूप लोकांना गमावले आहे, प्रत्येकाचे कोणी न कोणी सोडून गेले आहे. आता आणखी हे आप्तेष्टांचे सोडून जाणे आपल्याला परवडणारे नाही, तेव्हा काळजी घ्या.
घ्यावयाची काळजी
या कोरोनापासून वाचण्यासाठी पुढील गोष्टी केल्या पाहिजेत. आपल्या आसपासच्या लोकांपासून कमीत कमी दोन हात अंतर राखणे चांगले, जेणेकरून आपण संसर्ग टाळू शकाल. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. नियमितपणे किमान 20-30 सेकंद साबणाने हात धुवा. हात स्वच्छ करण्यासाठी एक चांगला अल्कोहोल सॅनिटायझर वापरा. डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार हात लावू नका. खोकला आणि शिंकताना आपले तोंड आणि नाक झाकून ठेवा. सर्दी, ताप, खोकला व श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होत असलेल्या रुग्णाजवळ जाणे टाळा. यांच्यापासून अंतर ठेवणे चांगले. संसर्ग टाळण्यासाठी चांगले मास्क आणि रबरी हातमोजे वापरा. लहान मुलांकडे विशेष लक्ष द्या, त्यांना समजवा. अनावश्यक प्रवास व फिरणे टाळा. कोणत्याही शारीरिक तक्रारीसाठी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला व तपासण्या करून घ्या. लवकरच कोरोनाची लस उपलब्ध होईल व संरक्षण मिळेल. आजपर्यंतच्या अनुभवाने असे निदर्शनास आले आहे की आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती हीच कोरोनाच्या संकटापासून वाचवू शकते, त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी संतुलित आहार घ्या. यासाठी आहारात प्रोटीन्स, व्हिटॅमिन सी असलेली फळे (संत्री, मोसंबी, पेरू), आले, हळद, तुळशीची पाने, झिंक-50 मी.ली.ग्राम व व्हिटॅमिन-डी सप्लिमेंटचा नियमित वापर करा. व्हिटॅमिन-डी मुळे कोरोना आजारपण टाळण्यासाठी आणि आजारी पडल्यावर लवकर बरे होण्यासाठी त्याचा खूप उपयोग होतो. नवीन कोरोना विषाणूंविरुद्ध लढण्यासाठी सरकार शक्मय ती सर्व पावले उचलत आहे. आपणही स्वतःची काळजी घ्या व कोरोनापासून बचाव करा. घाबरू नका. यापुढे त्याच्यासोबत जगणे शिकले पाहिजे.
डॉ.संजय पंतबाळेकुंद्री