गाफील राहुनका, नियमांचे पालन करा
प्रतिनिधी/ सातारा
राज्यासह जिल्हय़ात पुन्हा कोरोना संसर्गाच्या रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी सतर्क राहुन काळजी घेणे ही तितकेच गरजेचे आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता कित्तेक नागरिक गाफील राहुन नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. मास्क, सॅनेटायझरचा वापर करने सोशियल सुरक्षित अंतर पाळने, नियमीत हात धुने हे तर सोडुनच दिले असल्याचे दिसत आहे.
जसा की कोरोना हद्द पार झाला असल्याच्या भावनेत कित्तेक नागरिक वावरत आहेत. पण सध्याची परिस्थिती पाहता पुन्हा कोरोना रूग्णांच्या सख्येत वाढ होताना दिसत आहे. सध्याचे हे चित्र पाहता जिल्हाधिकाऱयांनी पुन्हा एकदा जिल्हय़ातील सर्व प्रांताधिकाऱयांना सतर्कतेच्या सुचना दिल्या आहेत.
पुन्हा लॉकडाऊन करण्याची गरज भासुनये याकरीता नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर कडक दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी याची खबरदारी घ्यावी. तसेच कोरोना संबंधीत कोणतीही लक्षणे अढल्यास त्वरीत डॉक्टरांच्या सल्याने तपासणी करून घ्यावी.
कोरोनाचा संसर्गाने रूग्णांची वाढती लोकसंख्या पाहता अमरावती, अकोला सारख्या शहरांमध्ये तर संचारबंदीच लागु केली आहे. तसेच यवतमाळ सारखा जिल्हा दि. 28 फेब्रुवारी पर्यंत पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे आपल्या जिल्हय़ावर ही परिस्थिती उद्भवु नये याकरीता नागरिकांनी सतर्क राहणे तितकेच गरजेचे आहे.
डॉ अनिरूध्द अठल्ये (जिल्हा आरोग्य अधिकारी)
नागरिकांनी बेफिकर राहुन चालणार नाही, कारण कोरोनाची भिती अद्याप कायम आहे. सर्व नागरिकांनी काटेकोरपणे कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करावे, शिस्त पाळावी. कारण लढाई ही अद्याप सुरू आहे, ती आपण सर्वांच्या यशस्वी प्रयत्नानेच जिंकु शकतो.