प्रतिनिधी/ बेळगाव
केंद्र सरकारने परप्रांतीय कामगारांना त्यांच्या गावी परत जाण्यास परवानगी द्यावी, असा आदेश सर्वच राज्यांना दिला आहे. त्यामुळे येथील परप्रांतीय कामगारांनी आपल्या गावाला जाण्यासाठी परवानगी द्यावी, यासाठी या कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली. यावेळी पोलिसांनी त्यांना सोशल डिस्टन्स ठेवून तसेच टप्प्याटप्प्याने तुम्हाला सोडले जाईल, असे सांगितले.
गेल्या चाळीस दिवसांपासून परप्रांतीय कामगार लॉकडाऊनमुळे अडकून पडले आहेत. साऱयांनाच आपल्या गावाकडे जाण्याची धडपड लागली आहे. यातूनच या कामगारांनी शनिवारी परवानगीसाठी जिल्हाधिकाऱयांकडे धाव घेतली होती. यावेळी काही वेळ त्या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. काही जणांना समजूत काढून पाठविण्यात आले आहे. तसेच टप्प्याटप्प्याने तुम्हाला तुमच्या राज्यात पाठविले जाईल, असे त्यांना सांगण्यात आले आहे.