वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना विषाणू संसर्गामुळे निर्माण झालेल्या संकटावर विचारमंथन करण्यासाठी
शुक्रवारी देशातील विरोधी पक्षनेत्यांची बैठक होणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी
काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, द्रमुकचे नेते स्टॅलिन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासह 15 राजकीय पक्षांचे नेते सहभागी होतील. या बैठकीत काँग्रेसच्या सहभागाबाबत अद्याप अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि केंद्र सरकारकडून राज्यांबाबत घेण्यात आलेल्या निर्णयांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. मागील आठवडय़ात पंतप्रधान नरेंद मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा केली. यावेळी ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारकडून भेदभाव केला जात असल्याचा आरोप केला होता. कोरोनाच्या मुद्यावरून राजकारण करू नका, असे आवाहनही त्यांनी केले होते. आम्ही केंद्र सरकारकडे डाळ देण्याची मागणी केली. मात्र यावर कोणताही निर्णय झाला नाही, अशी खंत 26 एप्रिल रोजी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती. मागील काही दिवस विरोधी पक्षांचे सरकार असणाऱया राज्यांमध्ये पेंद्र सरकारच्या धोरणांवर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी होणाऱया बैठकीत विरोधी पक्ष कोणती भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.