ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोना च्या पार्श्वभूमीवर सध्या देशात लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. लॉक डाऊन सुरू झाल्यापासून कारोना संदर्भात 95 हजार गुन्ह्यांची नोंद झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली.
ते म्हणाले, महाराष्ट्रात 22 मार्च ते 5 मे दरम्यान कलम 188 नुसार 95 हजार 678 गुन्हे दाखल करण्यात आले असून आतापर्यंत 18 हजार 722 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तसेच पोलिसांवर हल्ले होणाऱ्या 184 घटना असून त्यात 663 व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. या हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुढे ते म्हणाले, पोलीस विभागाचा 100 नंबर हा सर्व जिल्ह्यात 24 तास कार्यरत असून या नंबर वर 84 हजार 945 फोन आले असून त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली आहे.
त्याचबरोबर अवैध वाहतूक करणाऱ्या 1 हजार 269 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 53 हजार 071 वाहने जप्त केली गेली आहेत. तर विदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनाचे 15 गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत, असं ही त्यांनी यावेळी सांगितले.