ऑनलाइन टीम / मुंबई :
भारतात कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. भारतात कोरोना रुग्णांची एक हजार च्या वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 20 जणांनी आपला जीव गमावला आहे. या जीवघेण्या रोगाशी लढण्यासाठी विविध स्तरातून मदतीचे हात पुढेेे येत आहेत.
आता रिलायन्स इंडस्ट्रीज चे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी मदतीचा हात पुढे करत पीएम केअर्स फंडासाठी 500 कोटींची मदत जाहीर केली आहे. तसेच रिलायन्स ने कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी 100 बेड ची सुविधा असलेले रुग्णालय ही सुरू केले आहे.
तसेच मुकेश अंबानी यांनी महाराष्ट्र व गुजरात च्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये अनुक्रमे 5 – 5 कोटी रुपये दिले आहेत. या आजारा ला रोकण्यासाठी मास्क गरजेचे असल्याने दिवसाला एक हजार मास्क ची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.