ऑनलाइन टीम / मुंबई :
कोरोना च्या लढाईत महाराष्ट्र राज्यातील पोलीस आपल्या जीवाची पर्वा न करता आपले योगदान देत आहेत. कर्तव्य बजावत असतात पोलिस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियाना 50 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येईल, अशी माहिती उमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
गृहमंत्री अनिल देशमुख आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या सोबत उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली. आरोग्य, वैद्यकीय, पोलीस विभागांना प्राधान्याने वेतन देण्याबाबत यावेळी चर्चा झाली. मार्च महिन्याचे वेतन ही प्राधान्याने देणार असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.
त्याचबरोबर कोरोनाच्या लढ्यात होमगार्ड जवानांची अतिरिक्त मदत घेण्याचे अधिकार विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.