बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के
प्रतिनिधी /पणजी
कोरोनामुळे राज्यात मंगळवारी चौघांचे बळी गेले असून ते सर्व गोमेकॉत उपचार घेत होते. त्याशिवाय गत 24 तासात 257 बाधित सापडले आहेत व 230 जण कोरोनामुक्त झाले आहेत. बरे होण्याचे प्रमाण 97 टक्क्यांवर पोहोचले आहे. सक्रिय रुग्णसंख्या 1957 एवढी झाली आहे.
मंगळवारी 5530 जणांची चाचणी करण्यात आली होती. त्यातील 257 बाधित सापडले. त्यापैकी 11 जणांना गोमेकॉत दाखल करण्यात आले तर 246 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले. 10 जणांना गोमेकॉतून घरी पाठविण्यात आले आहेत. आतापर्यंत वर्षभरातील एकूण बाधितसंख्या 167823 वर पोहोचली आाहे तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 162787 वर पोहोचली आहे. एकूण मृतसंख्या 3079 एवढी झाली आहे. मंगळवारी मृत्यू झालेले चारही रुग्ण गोमेकॉत उपचार घेत होते. त्यात 2 पुरुष व 2 महिला रुग्णाचा समावेश आहे. ते सर्वजण 38 ते 77 वर्षे वयोगटातील आहेत.
कासारवर्णेत सर्वात कमी रुग्ण राज्यातील 33 पैकी केवळ शिवोली, कुठ्ठाळी आणि फोंडा या तीन केंद्रात तीन अंकी संख्येने रुग्ण आहेत. त्यातील सर्वाधिक 112 रुग्ण कुठ्ठाळी केंद्रात, त्या खालोखाल 103 रुग्ण फोंडय़ात तर शिवोलीत 100 रुग्ण आहेत. सर्वात कमी 15 रुग्ण कासारवर्णे केंद्रात आहेत.