प्रतिनिधी / कोल्हापूर
महाराष्ट्र परिवहन महामंडळ शासनामध्ये विलिनीकरण व्हावे यासाठी रविवारी मध्यरात्रींनतर संघटना विरहीत एसटी कर्मंचाऱयांनी संप पुकारला आहे. मंगळवारी कागल,गारगोटी आगारही संपामध्ये उतरल्याने, कोल्हापूर आगार आता शंभर टक्के संपात सहभागी झाला आहे. या संपामुळे दोन दिवसात कोल्हापूर आगाराचे 70 लाखाचे उत्पन्न थांबले आहे. बुधवारी शासनाच्या निषेधार्थ मध्यवर्ती बसस्थानक परिसरात गोंधळाचा कार्यंक्रम सादर करण्यात येणार आहे. महामंडळाकडून कांही आगारातील कर्मचाऱयावर निलंबनाची कारवाई सुरू केली आहे. कोल्हापूर आगारामध्ये निलंबनाबाबत अजूनही सामंजस्याची भूमिका असल्याने कोणावरही कारवाई केलेली नाही.
मंगळवारी दुसऱया दिवशी संपामध्ये कागल व गारगोटी आगारामधील कर्मचारी सायंकाळनंतर उतरले. कोल्हापूर आगाराचा संप आता 100 टक्के सुरू झाला. यामुळे 4500 कर्मचाऱयापैकी 90 टक्के कर्मंचारी संपात उतरले आहेत. कागल व गारगोटी आगारामधून संपामध्ये उतरण्याचे पत्र संबधित विभागाकडे देण्यात आले आहे. सायंकाळी सहा नंतर हे दोन्ही आगार बंद झाले.तत्पूर्वी कागल आगारातून 225 तर गारगोटी आगारामधून 120 एसटी फेऱया झाल्या. तर इतर आगारामधून सुमारे 1300 फेऱया बंद राहील्या होत्या.
निलंबनाबाबत कोल्हापूर आगाराची भूमिका सामंजस्याची
महामंडळाने 45 आगारामधील 376 कर्मंचाऱयांना निलंबित करण्यात आल्याचे वृत पसरताच, कोल्हापूर आगाराचा यामध्ये समावेश आहे काय? अशी चर्चा संपाच्या ठिकाणी सुरू होती.याबाबत कोल्हापूर आगाराकडून सध्या तरी सामजस्याची भूमिका घेतली असून, कर्मचाऱयांच्या निलंबनाबाबत कोणताच विचार नसल्याचे जबाबदार सूत्राकडून सांगण्यात आले. मंगळवारी कोणावरही निलंबनाची कारवाई झालेली नसल्याचे सांगण्यात आले. पन्हाळा-शाहूवाडीचे आमदार डॉ. विनय कोरे यांनी संपाच्या ठिकाणी भेट देऊन या मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.
संपामध्ये चिमुकल्यासह सहभाग
एसटीच्या संपाची झळ कर्मचाऱयासह कुटुंबांनही बसत आहे. सुप्रिया पाटील या महीला वाहक यांनी आपल्या दोन वर्षाच्या चिमुकल्यासह या संपामध्ये सहभागी झाल्या होत्या.