ऊस वाहतूकदारांचे ही धाबे दणाणले
प्रतिनिधी / शिरोळ
गतसालाप्रमाणे यावर्षीही कोरोनाविषाणूच्या पार्श्र्वभूमीवर लॉकडाऊन होईल या भीतीपोटी जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यातील ऊस तोड मजूर टोळ्या आपापल्या गावी पळून जात असल्याने ऊस वाहतूकदार साखर कारखाना व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चिंता लागून राहिली आहे.
कोरोनामुळे गतसाली ऊसतोड मजुरांचे हाल झाले होते कडक लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे ऊसतोड मजूर ज्या त्या गावांमध्ये व कारखान्याच्या कार्यस्थळावर अडकून पडले होते. गावातील आपल्या पाल्याच्या चिंता त्यांना लागून राहिली होती. सातत्याने आम्हाला आमच्या गावाकडे सोडा अशी वारंवार विनंती कारखान्याच्या व्यवस्थापकाबरोबर करीत होते. हीच परिस्थिती चालू वर्षी होऊ नये यासाठी काही ऊसतोड मजुरांच्या टोळ्या रात्रीच्या वेळी पसार होत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर, परभणी ,बीड, यासह अन्य जिल्ह्यातून अनेक ऊसतोड मजुरांच्या टोळ्या आल्या आहेत. जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांच्या हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. गावाकडे असलेल्या नातेवाईकांनी लॉकडाऊन होण्यापूर्वीच गावाकडे येण्यासाठी निरोप देत आहेत. यासंदर्भात काही साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला.
ऊसतोड मजुरांच्या काही टोळ्या कुणाचीही परवानगी न घेता रात्रीच्या वेळी आपल्या कुटुंबांना पाठवून देण्याची व्यवस्था करीत आहेत बहुसंख्य गावातील एस टी स्टँडवर या लोकांची वर्दळ वाढल्याचे दिसून येते. काही ऊसतोड मजुरांच्या टोळ्या गेल्याने वाहतूकदारांचे धाबे दणाणले असून काढलेले कर्ज फेडायचे कसे ही चिंता लागून राहिली आहे. गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना ऊसतोड मजूर पळून जात असल्याने वाहतुकदारांच्या बरोबर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मधूनही