भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मराठा आरक्षण उपसमितीचे माजी अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आरोप
ठाकरे सरकारने सारथी संस्थेची वाट लावली
प्रतिनिधी / कोल्हापूर
मराठा आरक्षणावर अध्यादेश हे उत्तर असू शकत नाही. कारण, कायदा हायकोर्टात टिकला, हे आपले भांडवल आहे. तुमच्या अध्यादेशामुळे तो हक्क घालवून बसाल; त्यामुळे अध्यादेशावर दुसऱ्या दिवशी स्थगिती येईल, असा इशारा मराठा आरक्षण उपसमितीचे माजी अद्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला सारथी संस्थेची ठाकरे सरकारने वाट लावल्याचा आरोप ही त्यांनी केला आहे. सोमवारी ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
ते म्हणाले, महाविकास नव्हे, महाभकास आघाडीला आरक्षण टिकवता आले नाही. राज्य सरकारकडे मराठा आरक्षणाबाबत इच्छाशक्ती नाही. मुळात तिन्ही पक्षात सुसूत्रता नसल्याने आरक्षण कोर्टात टिकले नाही. मुख्यमंत्री ठाकरे यांनी याबाबत कधी चर्चा केली नाही. काँग्रेसला देखील मराठा समाजाला आरक्षण द्यावे, यात रस नसल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला मुख्यमंत्री ठाकरे घरी बसून राज्य चालवणारे आहेत. सारथी संस्थेची देखील या सरकारने वाट लावली, असा टोला लगावत महाविकास आघाडी सरकारकडून मराठा समाजाला ‘उल्लू’ बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व खासदार संजय राऊत यांना, त्यांना जे अपेक्षित आहे तेच इतरांनी म्हणावे, असे वाटते. त्यांची चूक दाखवली तर, पत्रकारसुद्धा जेलमध्ये जातील. केवळ त्यांची स्तुती करावी असे त्यांना वाटते.
ठाकरे आणि राऊत यांना केवळ भाटगिरी हवी आहे
ठाकरे आणि राऊत यांना केवळ भाटगिरी हवी आहे, अशी खर मारीत टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणात 45 दिवसांत एफआर का दाखल नाही केला, असा सवाल करत आम्ही चुका दाखवतच राहणार. चुका दाखवणे म्हणजे, महाराष्ट्राची बदनामी नव्हे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. महाराष्ट्राची आणि पोलिसांची बदनामी तुम्हीच केली, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.