चित्रपट महामंडळाचा निर्माता, दिग्दर्शकांना इशारा, भरारी पथकांचा चित्रिकरण सेटवर वॉच
अहिल्या परकाळे / कोल्हापूर
राज्य अनलॉककडे जात असताना चित्रपट व मालिकांच्या चित्रिकरणासाठी शासनाने सशर्त परवानगी दिली. चित्रिकरणाला सुरूवातही झाली परंतू चित्रिकरणाच्या सेटवर कोरोनाचा शिरकाव झाल्याने ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोना निधन झाले. अन्य 27 कलाकारांना कोरोनाची बाधा झाल्याने मालिकेचे चित्रिकरण थांबले आहे. त्यामुळे आता अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने तयार केलेल्या भरारी पथकांचा वॉच मालिका, चित्रपटांच्या सेटवर राहणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या कोरोना नियमांचे पालन न करणाऱया निर्मात्या, दिग्दर्शकांना पॅकअप करावे लागणार, असा चित्रपट महामंडळाने इशारा दिला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लॉकडाऊन केल्याने चित्रपट व मालिकांचे शुटींग थांबले. याचा फटका चित्रपट सृष्टीतील तंत्रज्ञ, स्पॉट बॉय, मेकअपमॅन, आदीं पडद्यामागच्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे चित्रपट महामंडळातील पदाधिकाऱयांसह निर्मार्ते, दिग्दर्शकांनी चित्रकरणास परवानगी मिळण्यासाठी सरकार दरबारी विनवनी केली. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या सहकार्यातून कोल्हापुरात मालिका व चित्रपटांच्या चित्रिकरणाला सुरूवात केली. त्यामुळे चित्रपट सृष्टीवर अवलंबून असणाऱया कलाकार, तंत्रज्ञ, कामगारांना दिलासा मिळाला आहे. परंतू चित्रिकरणा दरम्यान सेटवर कोरोनाच्या नियमांचे पालन होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या. सातारा जिल्हÎात चित्रिकरण सुरू असलेल्या `आई माझी काळूबाई’ मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता बोरगावकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर या मालिकेच्या 27 कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कलाकारांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
राज्य शासनाने चित्रपट व मालिकांचे चित्रिकरण करण्यासाठी सशर्त परवानगी दिली आहे. परंतू सेटवर कोरोनाच्या नियमांचे पालन न केल्याने मालिका व चित्रपटांच्या सेटवर कोरोनाने शिरकाव केल्याचे निदर्शनास आले आहे. म्हणूनच चित्रपट महामंडळाने भरारी पथकाची स्थापन केली आहे. या भरारी पथकाने कोल्हापुरातील मालिकांच्या सेटची पाहणी करणार आहेत. शासनाच्या नियमांचे पालन न करणारांवर ही भरारी पथके पोलिसांच्या मदतीने कारवाई करणार असल्याचेही समजते.
कलाकारांची आरोग्य तपासणी बंधनकराक
चित्रपट, मालिकांच्च्या चित्रिकरणा दरम्यान बाहेरील व्यक्तीला सेटवर घेवू नये. सर्व कलाकारांची कोरोनासह नियमित आरोग्य तपासणी करावी. कलाकार चित्रिकरणाच्या सेटवर आल्यानंतर पुन्हा मुंबईला जाण्यास परवानगी देवू नये. जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासनाच्या परवानगीशिवार ` चित्रपट, मालिका, वेबमालिका, जाहिरात, माहितीपटाचे चित्रिकरण करू नये. भरारी पथकांचे चित्रिकरणाच्या सेटवर बारकाईने लक्ष राहणार आहे.
मेघराज राजेभोसले (अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे, अध्यक्ष)
पुन्हा चित्रपट क्षेत्र धोक्यात येईल
कोरोनाच्या नियमांचे पालन न केल्यास शासनाकडून चित्रिकरण थांबवले तर या व्यवसायावर अवलंबून असणाऱया कलाकारांवर पुन्हा उपासमारीची वेळ येईल. सेटवरचे कलाकार, डान्सर मुंबईला जा ये करतात ते थांबवले नाही तर पुन्हा चित्रपट क्षेत्र धोक्यात येईल.
धनाजी यमकर (अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, उपाध्यक्ष)
सेट, निवासस्थानासह जेवणाची तपासणी होणार
चित्रपट महामंडळाची भरारी पथके चित्रपट, मालिकांमधील कलाकारांच्या निवास्थानासह सेटची तपासणी करणार आहेत. हलगर्जीपणा केल्याचे आढळून आल्यास पोलीसांच्या मदतीने चित्रिकरणाचे पॅकअप करण्याच्या सूचना दिल्या जातील. त्यामुळे कोल्हापूर जिल्हÎात सुरू असलेल्या `तुझ्यात जीव रंगला’, `जीव झाला येडापिसा’, `सेम टू सेम प्रेमाचा गेम’, आदी मालिकांच्या निर्माता, दिग्दर्शकांनी आरोग्याविषयी सतर्क राहण्याची गरज आहे.