दोन वर्षात चार तालुक्यासंह दोन नगरपालिकांचा समावेश, राधानगरी, कागल, गगनबावडा, चंदगड, आजरा तालुक्यात केरोसिन सुरु
प्रवीण देसाई/कोल्हापूर
जवळपास सर्वच ग्राहकांकडे गॅस पोहोचल्याने मार्च महिन्याच्या अखेरीस भुदरगड तालुका केरोसिनमुक्त असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाकडून घोषित करण्यात आले. गेल्या दोन वर्षात शिरोळ, पन्हाळा, शाहुवाडी या तालुक्यांसह गडहिंग्लज, पन्हाळा नगरपालिका केरोसिनमुक्त झाल्या आहेत. अजून कागल, राधानगरी, गगनबावडा, चंदगड व आजरा या तालुक्यात केरोसिनची आवश्यकता असल्याने त्या ठिकाणी पुरवठा सुरु आहे. एकंदरीत कोल्हापूर जिह्याची वाटचाल केरोसिनमुक्तीकडे सुरु असल्याचे चित्र आहे.
केरोसिनमुक्त जिल्हा ही संकल्पना राज्य शासनाची आहे. गेल्या पाच वर्षांपासून पुरवठा विभागाकडून मोहिम हाती घेण्यात आली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी नगरपालिकेसह अन्य काही नगरपालिका केरोसिनमुक्त झाल्या. सध्या गावागावात वाडÎा वस्त्यांवर गॅस सिलिंडर पोहोचली आहेत. तसेच उज्वला गॅस योजनेतून शासनाने दारिद्य रेषेखालील लाभार्थ्यांना गॅस सिलिंडर दिले आहेत. त्यामुळे जिह्यातील बहुतांश शहरे व तालुके केरोसिनमुक्त झाले आहेत.
नुकताच मार्च महिन्यामध्ये भुदरगड तालुका हा केरोसिनमुक्त झाला आहे. तत्पूर्वी गेल्या दोन वर्षात शिरोळ, पन्हाळा, शाहुवाडी या तालुक्यांसह गडहिंग्लज व पन्हाळा नगरपालिका केरोसिनमुक्त झाल्या आहेत. अजून काही तालुके केरोसिन मुक्त झालेले नाहीत. यामध्ये अजून पाच तालुक्यांसाठी अजून केरोसिनची आवश्यकता असल्याने त्या ठिकाणी पुरवठा होत आहे. यामध्ये कागल तालुक्यासाठी 24 किलोलिटर (24 हजार लिटर), राधानगरी तालुक्यासाठी 12 किलोलिटर (12 हजार लिटर), गगनबावडा तालुक्यासाठी 12 किलोलिटर (12 हजार लिटर),, चंदगड तालुक्यासाठी 12 किलोलिटर (12 हजार लिटर), आजरा ाालुक्यासाठी 12 किलोलिटर (12 हजार लिटर) केरोसिनची मागणी सध्या आहे. या प्रमाणातील मागणीनुसारच त्या ठिकाणी पुरवठा सुरु आहे.
4 लाख लिटरवरुन 72 हजार लिटरवर आले केरोसिन
दोन वर्षापूर्वी जिह्याची केरासिनची मागणी 400 किलोलिटर (4 लाख लिटर) होती. त्यानंतर टप्प्या टप्प्याने हे केरोसिन कमी होते. सध्या केरोसिनची मागणी 72 हजार लिटरवर येऊन पोहोचली आहे.
अशी आहे प्रक्रिया……
तालुक्यातील गॅस सिलिंडरचा वापर करणार्या लाभार्थ्यांचा आढावा तहसिलदार संबंधित गॅस एजन्सीकडून घेतात. त्यानंतर याबाबतचा अहवाल जिल्हा पुरवठा विभागाला पाठविला जातो. त्यानंतर तालुका केरोसिनमुक्तीची घोषणा जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून केली जाते.
केरोसिनमुक्त जिल्हा हे धोरण राज्य शासनाचे आहे. त्यानुसारच ज्याच्याकडे गॅस सिलिंडर आहे. त्याचे केरोसिन बंद केले जात आहे. नुकताच भुदरगड तालुका केरोसिनमुक्त झाला आहे.
-दत्तात्रय कवितके, जिल्हा पुरवठा अधिकारी