प्रतिनिधी/कोल्हापूर
रक्ताचा तुटवडा भासू लागल्याने जिल्ह्यातील प्रत्येक रक्तपेढ्यांनी किमान ३ ते ५ रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे, अशी सूचना पुणे विभागाचे अन्न औषध प्रशासन सह आयुक्त एस.बी. पाटील यांनी केली आहे.
कोव्हिड १९ च्या परिस्थितीत रूग्णसंख्या वाढत असल्याने रूग्णांना आवश्यक रक्त व रक्तघटक तात्काळ मिळणे अत्यंत गरजेचे आहे. यापूर्वी दिलेल्या सूचनांचे पालन करुन तात्काळ रक्तदान शिबीरांचे आयोजन करावे, असे सर्व रक्तपेढ्यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात श्री. पाटील यांनी म्हटले आहे.