मान्सूनपूर्व पावसाने झोडपले- जमिनीत पुरेसा ओलावा- बळीराजाची लगबग, उघडीपीची गरज
प्रतिनिधी/ बेळगाव
तालुक्मयात मान्सूनपूर्व पावसाने झोडपल्याने जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने भात पेरणी कामाला प्रारंभ झाला आहे. पेरणी कामाला सुरूवात झाली असली तरी हंगाम साधण्यासाठी उघडीपीची गरज आहे. दरम्यान अधून-मधून पाऊस सुरू असल्याने मशागतीची कामे लांबणीवर पडली आहेत. तर पावसामुळे पेरणी कामात अडथळा देखील निर्माण होत आहे. येत्या दिवसात उघडीप पडल्यास खरीप हंगामातील पेरणीसाठी शेतकऱयांची लगबग सुरू होणार आहे. काही ठिकाणी भात पेरणीसह भुईमूगची पेरणी सुरू असलेली पहायला मिळत आहे.
भात पेरणीबरोबर धूळपाफ पेरणीच्या उगवणीसाठी मान्सूनपर्व पाऊस उपयुक्त ठरत आहे. वारंवार होत असल्याने दमदार पावसामुळे मशागतीच्या कामात अडथळा निर्माण होऊन मशागतीची कामे लांबणीवर पडली आहेत. तालुक्मयाच्या उचगाव, बेळगुंदी, बडस, बेळवट्टी, कडोली, हंदिगनूर, चलवेनहट्टी, केदनूर, बंबरगे, मण्णूर, आंबेवाडी बिजगर्णी, बसुर्ते, कोनेवाडी, मंडोळी, सावगाव, बेकिनकेरे, अतिवाड, गोजगा, कल्लेहोळ, बाची, तुरमुरी, आदी भागात मान्सूनपूर्व पावसाने झोडपले आहे. त्यामुळे बळीराजा बि-बियाणे, खते व अवजारांची जमवाजमव करताना दिसत आहे. दमदार पावसामुळे काही शिवारात पाणी साचून आहे. त्यामुळे पेरणी लांबणीवर पडण्याची शक्मयता व्यक्त होत आहे.
तालुक्यात खरीप हंगामात भात पिकाबरोबर बटाटे, रताळी, भुईमूग, सोयाबीन, मका आदी पिकांचे उत्पादन घेतले जाते. तालुक्मयात भात पिकाचे क्षेत्र अधिक असून उत्पादन वाढीसाठी नवीन जातीच्या इंद्रायणी, बासमती, सोनम, आमन यासह दोडगा, मनिला, भोगावती, शुभम आदी जातीच्या भात बियाणाला मागणी वाढली आहे.
खताच्या किमतीत वाढ तालुक्मयात दमदार पाऊस होत असल्याने पेरणीची कामे हाती घेण्यात आली आहेत. पेरणीला सुरुवात झाल्याने बी-बियाणे व खताच्या मागणीत वाढ झाली आहे. कृषी खात्याकडून मात्र कोणतीच बी-बियाणे मिळत नसल्याने शेतकऱयांना भरमसाट पैसे मोजून ती खासगी दुकानदारांकडून खरेदी करावी लागत आहेत. त्याचबरोबर गेल्या वर्षीच्या तुलनेत रासायनिक खताच्या किमती देखील वाढल्याने मोठा आर्थिक फटका बसत आहे.