घरपट्टी विलंबाने भरल्यास दंडात्मक कारवाई : विलंबाने काम करणाऱया अधिकाऱयांना दंड आकारण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
घरपट्टी वेळेत भरण्यासाठी मनपाकडून आवाहन करण्यात येते. वेळेत घरपट्टी न भरल्यास दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जातो. खाते बदलसाठी आलेले अर्ज मनपा कार्यालयात धूळ खात पडले आहेत. पण निकालात काढण्याची तसदी घेतली जात नाही. त्यामुळे अधिकाऱयांकडून होणाऱया विलंबाबाबत दंड वसूल करून सर्वसामान्यांना नुकसानभरपाई म्हणून द्यावी, अशी मागणी होत आहे.
मनपाकडून प्रत्येक मालमत्तेची घरपट्टी आगाऊ जमा करून घेण्यात येते. वास्तविक दि. 1 एप्रिलपासून आर्थिक वर्षाची सुरुवात होते. मात्र, घरपट्टी एप्रिल महिन्यातच भरावी असा नियम मनपाने लागू केला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात 5 टक्के सवलत दिली जाते. मे व जून असे दोन महिने घरपट्टी भरण्याची मुभा आहे. मात्र, घरपट्टी न भरल्यास जुलैपासून 2 टक्के दंड आकारण्यात येतो. त्यामुळे वर्षापोटी मालमत्ताधारकांना 24 टक्क्मयांपर्यंत दंड भरावा लागतो. मात्र नागरिकांनी मनपाकडे कोणत्याही कामाकरिता अर्ज केल्यास वेळेत कामे केली जात नाहीत. घरपट्टी भरण्यास विलंब झाल्यास दंड आकारला जातो. मात्र मनपाच्या महसूल विभागाकडून विलंब झालेल्या कामाबद्दल कोणतीच कारवाई केली जात नाही. त्यामुळे नागरिकांची कामे वेळेत न करणाऱया अधिकारी व कर्मचाऱयांकडून दंड वसूल करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
मालमत्ता खरेदी-विक्री झाल्यास किंवा वारसाप्रमाणे नावे दाखल करण्याकरिता मनपाकडे अर्ज करावा लागतो. खाते बदलसाठी मनपाकडे अनेक अर्ज आले आहेत. पण विविध कारणे सांगून नागरिकांचे अर्ज प्रलंबित ठेवण्यात येत आहेत. खातेबदलकरिता सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडूनही मनपाच्या महसूल विभागाकडून वेळेत कामे केली जात नाहीत. यासाठी चार-पाच महिने व काही मालमत्ताधारकांना वर्षभर प्रतीक्षा करावी लागते. मनपाच्या विभागीय कार्यालयात विचारणा केल्यास मुख्य कार्यालयात अर्ज पाठविल्याचे सांगण्यात येते. तेथे विचारणा केली असता विभागीय कार्यालयात फाईल असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे मालमत्ताधारकांना धावपळ करावी लागत आहे.
अधिकारी-वॉर्ड क्लार्कचे फावले
खातेबदलसाठी मनपाच्या पायऱया झिजवाव्या लागत आहेत. काही वरि÷ अधिकाऱयांच्या मनमानी कारभारामुळे असंख्य फाईल प्रलंबित आहेत. क्षुल्लक कारणामुळे त्यांच्याकडून सहय़ा करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे अधिकाऱयांचे व वॉर्डक्लार्कचे फावले आहे. विलंब होत असल्याने लवकर काम करा, अशी विनंती केल्यास चिरीमिरीची मागणी करण्यात येत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. चिरीमिरीसाठीच विलंब केला जात असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. खातेबदल अर्ज निकालात काढण्यासाठी आयुक्त जगदीश के. एच. यांच्याकडे अनेक मालमत्ताधारकांनी तक्रारी केल्या आहेत. आयुक्तांच्या सूचनेनंतरही महसूल विभाग अधिकारी अर्ज निकालात काढत नसल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकांना निवडणुकीचे आणि विविध सर्वेक्षणाचे कारण सांगून माघारी पाठविण्यात येते. लहरीपणामुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे रखडली आहेत. त्यामुळे खातेबदलाच्या फाईलसह अन्य प्रलंबित अर्ज तातडीने निकालात काढण्यात यावेत. ते प्रलंबित ठेवणाऱयांकडून दंड आकारणी करून नागरिकांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.