निजद नेते नासीर बागवान यांची घोषणा
वार्ताहर /नंदगड
गावागावात संत ज्ञानेश्वरी पारायण सोहळय़ांच्या निमित्ताने वारकरी एकत्र येतात. पारायणाच्या माध्यमातून गावात प्रतिपंढरीचे स्वरुप प्राप्त होते. सर्वत्र विठ्ठलनामाचा जयघोष होतो. या जयघोषातून एकप्रकारे सर्वांना ऊर्जा मिळते. गेले काही वर्षे मीसुद्धा माझ्या गोलिहळ्ळी येथील शेतात पारायण सोहळय़ाचे आयोजन केले होते. पारायण सोहळय़ाच्या निमित्ताने खानापूर तालुक्मयातील सर्व वारकरी एकत्रित यावेत, नित्यनेमाने भजन-कीर्तने व्हावीत, यासाठी खानापूर शहराजवळ स्वतःच्या जागेत स्वखर्चाने श्री संत ज्ञानेश्वरांच्या नावाने वारकरी भवन बांधून देणार असल्याची घोषणा निधर्मी जनता दलाचे नेते नासीर बागवान यांनी केली.
हिंडलगी (ता.खानापूर) येथे नुकताच आयोजित केलेल्या संत ज्ञानेश्वर दिंडी उत्सवाच्या समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
ते म्हणाले, पंढरपूरच्या विठ्ठलाचे खानापूर तालुक्मयात हजारो वारकरी आहेत. वारकऱयांसाठी वारकरी भवन निर्माण करण्याची आपली अनेक दिवसांपासून इच्छा आहे. या भवनात वारकऱयांसाठी भजन, कीर्तनाबरोबरच कायम जेवणाची सोय करून देणार आहे, असे सांगितले.
यावेळी दिंडी उत्सवात धारवाडचे विठ्ठल महाराज, गणपतराव घोरपडे, रमेश जेडी, मारुतीराव मोकाशी, मारुती अळवणी आदींसह मान्यवर उपस्थित होते. दिंडी उत्सवाच्या निमित्ताने पालखी उत्सव व महाप्रसाद झाला. पारायण सोहळय़ाला परिसरातील वारकरी व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.