277 बुथवर होणार मतदान, 51 ग्राम पंचायतीसाठी 294 मतदान केंद्रे
खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात 51 ग्राम पंचायतीसाठी 294 मतदान केंद्रे ठेवण्यात आली आहेत. पण त्यापैकी 17 मतदान केंद्रांतर्गत होणाऱया निवडणुकीतील जागा बिनविरोध झाल्याने आता एकूण 277 मतदान केंदावर मतदानाची प्रक्रिया होणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर चार या प्रमाणे एकूण 1108 कर्मचारी नियुक्ती करण्यात आले आहेत. या शिवाय पोलीस व होमगार्डची संख्या वेगळी आहे.
तालुक्यात 51 ग्राम पंचायतीच्या व्याप्तीत 294 मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी बिनविरोध निवड झालेल्या 17 मतदान केंद्रावर मतदान होणार नसल्याने उर्वरित 277 केंद्रावर मतदान होणार आहे. एका मतदान केंद्रावर एक पीआरपो आणि दोन पोलीस ऑफीसर असे प्रत्येकी चार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस आणि होमगार्डची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोनामुळे मतदान केंद्रांवर गर्दी होणार नाही याची दक्षता निवडणूक अधिकाऱयांना घ्यावी लागणार आहे. मतदारांना सामाजिक अंतर ठेवून रांगेत उभे राहण्यासाठी केंद्रावर आगाऊ मार्किंग करावे लागणार आहे. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. तर सायंकाळी 5 पर्यंत मतदान होणार आहे. तर एखाद्यावेळी कोरोना रुग्ण असल्याचे अशा मतदाराना सायंकाळी 5 ते 6 पर्यंत असा एक तास मतदानासाठी वेळ ठेवण्यात आला आहे.
डीसी, एसपींची प्रशिक्षण स्थळी भेट
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ आणि जिल्हा पोलिसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी सर्वोदय विद्यालय येथील प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांनी तालुक्मयातील मतदान केंद्रांची माहिती दिली. जिल्हाधिकाऱयांनी पीआरओ, एआरओ आणि पीओ कर्मचाऱयांशी संवाद साधून जबाबदारीची दक्षतेने पालन करण्याची सूचना केली. कोरोनामुळे सामाजिक अंतर आणि मास्कची मतदान केंद्रांवर सक्ती करावी. गर्दी न करता सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पाडण्याच्या सूचना केल्या. मतदानानंतर मतपेटय़ा सर्वोदय विद्यालयातील स्ट्रॉग रूममध्ये आणून ठेवण्यात येणार आहेत. स्ट्रॉगरुममधील व्यवस्थेचीही जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांनी पाहणी केली.