प्रतिनिधी/ खानापूर
खानापूर शहर परिसरात गुरुवारी रात्री 7.30 वाजता अचानकपणे मुसळधार पाऊस पडला. जवळजवळ तासभर पडलेल्या पावसाने काही वेळ विश्रांती घेतली पण रात्री 10 वाजता पुन्हा प्रारंभ केला. याचवेळी खानापूर शहराबरोबरच तालुक्याच्या विविध भागातही पावसाने हजेरी लावली. त्यातच तालुक्यात सध्या सुगीचा हंगाम चालू आहे. अनेक शेतकऱयांनी भात मळण्या सुरू केल्या होत्या पण या पावसामुळे मळण्यांवर संकट निर्माण करून शेतकऱयांचे नुकसान केले आहेत. यावर्षी ढगाळ हवामानामुळे आधीच वीट व्यवसायालाही उशिरा सुरुवात झाली आहे. गेल्या 8 दिवसांपासून तालुक्यात वीट बनविण्याच्या कामाला सुरुवात झाली होती. मात्र या मुसळधार पावसामुळे वीट उत्पादकांचा कच्चा माल खराब होऊन वीट उत्पादकांचे नुकसान झाले आहे. या भागात ऊसतोडही मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. अचानक पडलेल्या या पावसामुळे शेतवडीत ऊस वाहू वाहनेही जाऊ शकत नसल्यामुळे ऊस वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे.