प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीत व्यापाऱयांच्या बैठकीत निर्णय : शहरात किराणा सामानासह सर्व व्यवसायांवर निर्बंध : वैद्यकीय, तातडीची सेवा, बँक-सोसायटय़ांना मुभा
वार्ताहर / खानापूर
खानापूर तालुक्मयात दिवसागणिक कोविड रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यातच बाजारपेठेत जीवनोपयोगी वस्तू खरेदीसाठी सकाळी बारापर्यंत होणारी गर्दी लक्षात घेता खानापूर शहर पूर्णतः बंद करण्याचा निर्णय व्यापारीवर्गाने घेतला आहे. केवळ दवाखाने, मेडिकल व तातडीची सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवून आठवडाभर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय शनिवारी प्रांताधिकारी अशोक तेली यांच्या उपस्थितीत पोलीस स्थानक आवारात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे सोमवार दि. 10 मे रोजी सकाळी 10 वाजल्यापासून संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची सर्वांनी गांभीर्याने दखल घेऊन आगामी आठवडाभर सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
कोविड महामारीचा प्रसार रोखण्यासाठी सोमवार 10 दि. मे पासून रविवार दि. 16 मे च्या पहाटेपर्यंत शहरातील सर्व प्रकारच्या व्यवसायांवर बंदी घालण्याचे व्यापारी व पोलीस अधिकाऱयांच्या बैठकीत कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. शनिवारी शहरातील पोलीस ठाण्याच्या आवारात विविध जाती-धर्माचे नेते, व्यापारी, विपेते आणि नगरसेवक उपस्थित होते. उपस्थितांनी किराणा सामानासहित सर्व भांडार बंद ठेवण्याची मागणी केली. या काळात केवळ सकाळी व संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत दूध विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. भाजीपाला आणि फळ विपेत्यांना शहराबाहेर, रस्त्यांवरून विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. दराबाबत तक्रारी आल्यास भाजी-फळे विपेत्यांवरही कारवाई केली जाईल, असे सूचित करण्यात आले आहे. शिव-बसव जयंती तसेच रमजान घरातच साजरा करा, लॉकडाऊनदरम्यान रहदारी पूर्णपणे रोखण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरात नाहक फिरणाऱयांवर योग्य क्रम घेण्यात येईल असेही यावेळी ठरविण्यात आले.
सर्वांनी आपापले सण घरातच साजरे करावेत
दि. 14 रोजी रमजानसह शिव-बसव जयंतीचाही उत्सव आहे. परंतु सर्व धर्मियांनी कोरोना संसर्गाची गंभीरता लक्षात घेता आपापल्या घरात राहून रमजान, बसव जयंती आणि शिवजयंती साधेपणाने साजरी करावी, असे आवाहन करण्यात आले.
बैठकीत बोलताना पोलीस उपनिरीक्षक बसवराज पाटील यांनी येत्या आठवडाभरात शहरात अनावश्यक फिरणाऱया दुचाकी, चार चाकी वाहनधारकांवर कायदेशीर बडगा उगारला जाईल. प्रसंगी गाडय़ा जप्त करून दंडात्मक कारवाई केली जाईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन केले. प्रांताधिकारी अशोक तेली यांनीही राज्य शासनाने लॉकडाऊन काळात अनेक गोष्टींना मुभा दिली आहे. पण स्थानिक समितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणे आठवडाभर कडक निर्बंध लादण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे आवाहन केले.
बैठकीला तहसीलदार रेश्मा तालिकोटी, उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, स्थायी कमिटी अध्यक्ष लक्ष्मण मादार, नगरसेवक आपय्या कोडोळी, रवी काडगे, पंडित ओगले, अमर जोरापूर, गुंडू तोपिनकट्टी, विनायक कलाल यासह अनेक व्यापारी, फळ-भाजी विपेते व प्रति÷ित नागरिक, पोलीस कर्मचारी, महसूल कर्मचारी, नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
बँका-सोसायटय़ांना मुभा
या काळामध्ये केवळ वैद्यकीय व तातडीची सेवा सुरू करण्यासाठी बैठकीत निर्णय झाला आहे. बँका व सोसायटय़ांसंदर्भात बैठकीत निर्णय झाला नाही. या संदर्भात विचारले असता सोसायटी अथवा बँक कर्मचाऱयांनी आपल्या व्यवस्थापकांच्या सही-शिक्क्यासह ओळखपत्र वापरावे. निर्धारित वेळ ठरवून कर्मचाऱयांच्या गर्दीत कपात करून कामकाज करावे व सहकार्य करावे, असे आवाहन उपनिरीक्षक बसवराज पाटील यांनी केले आहे. शहर आठवडाभरासाठी कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय बैठकीत घेतल्यानंतर रविवारी सकाळच्या सत्रात किराणा व्यापारासाठी एकच गर्दी झाली होती. सकाळी सहापासून पोलिसांना गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बरीच कसरत करावी लागली. परंतु ग्रामीण भागातून आलेले लोक खरेदीसाठी दुकानांमध्ये तुटून पडत होते. प्रत्येक दुकानात खरेदीसाठी रांगाच्या रांगा लागल्या होत्या. ही वाढती गर्दी धोक्मयाची घंटा बनली असून आता ही साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध आवश्यक असल्याचे मत खानापूर शहरवासीय तसेच व्यापारीवर्गातून व्यक्त होत आहे.