वार्ताहर/ खेड
एसटी कर्मचाऱयांनी गेले आठ दिवस संप पुकारत वाहतूक बंद ठेवली आहे. सोमवारी कार्तिकी एकादशीचे औचित्य साधून येथील एसटी आगारासमोर संपात सहभागी कर्मचाऱयांनी कीर्तन व भजनाद्वारे एसटीच्या विलिनीकरणाकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
एसटी कर्मचाऱयांच्या संपाला जिल्हय़ात आठ दिवसांचा कालावधी लोटला असून सर्वसामान्यांचे विशेषतः ग्रामीण जनतेचे हाल होत आहेत. यामुळे छोटय़ा-मोठय़ा व्यवसायांवरदेखील मंदीचे सावट पसरले आहे. येथील एसटी कर्मचाऱयांनी कार्तिकी एकादशीचे निमित्त साधून संपाच्या ठिकाणी भजन व कीर्तन गात टाळ-मृदुंगाच्या सहाय्याने राम-कृष्ण-हरिचा जप करत राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, जिल्हय़ात काही कर्मचाऱयांवर निलंबनाची कारवाई तर काही कर्मचारी कामावर हजर झाले असले तरी येथील कर्मचाऱयांनी मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप चालूच राहणार असल्याची भूमिका घेतली आहे.
…