ऑनलाईन टीम / वाराणसी
समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आज उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गंगेत स्नान न केल्याचे निरिक्षण नोंदवत योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. गंगा नदी अस्वच्छ आहे. हे योगींना पक्के माहित आहे. म्हणूनच त्यांनी नदीत स्नान केलं नाही, अशी टीका अखिलेश यादव यांनी केली आहे.
पण खरी समस्या ही आहे की, गंगामाता स्वच्छ होणार का ? होणार असेल तर ती कधी होणार आहे. याबरोबर त्यासाठी मिळालेला पैसा वाहून गेला, मात्र गंगा अजूनही स्वच्छ झालेली नाही, असे स्पष्ट करत यादव यांनी योगींना फटकारले आहे.
पंतप्रधान मोदी हे दोन दिवसीय वाराणसी दौऱ्यावर होते. त्यांनी वाराणसीच्या ललिता घाट इथं गंगा नदीची पूजा करत स्नान केलं. ते काशी विश्वनाथ कॉरिडॉर प्रकल्पासाठी आले होते. त्यामुळे अखिलेश यादव यांनी पंतप्रधान मोदी यांच्या वाराणसी दौऱ्याच्या निमीत्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कारभारावर ही गंगा स्वच्छतेच्या निमित्ताने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.