नववर्षातील पहिल्या ‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांचे प्रतिपादन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गणतंत्रदिनी दिल्लीत घडविण्यात आलेला हिंसाचार आणि तिरंग्याच्या अपमानामुळे देशाला धक्का बसला असून देशवासिय दुःखी झाले आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते नववर्षातील प्रथमच ‘मन की बात’ या कार्यक्रमात देशाला उद्देशून बोलत होते. त्यांनी अर्थव्यस्था, कृषीक्षेत्रासह अनेक विषयांचा परामर्ष या कार्यक्रमात घेतला. ऑस्ट्रेलियात विजयी ठरलेल्या भारतीय क्रिकेट संघाचेही त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.
नव वर्षाचा प्रारंभ भारतनिर्मित लसीच्या लसीकरण कार्यक्रमाने झाला. ही बाब समस्त भारतीयांसाठी समाधानाची होती. कोरोना काळात आपण जगातील इतर देशांच्या तुलनेत उत्कृष्ट कामगिरी केली. भारतनिर्मित लस हा भारताच्या अभिनाचा विषय बनला. जगात भारताचे कौतुक झाले. भारताने इतर देशांनाही ही लस पुरवून उत्तरदायित्व निभावले, असा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला.
स्वातंत्र्याची 75 वर्षे
यंदा भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा प्रारंभ होणार आहे. स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढलेल्या योद्धय़ांचे म्मरण करण्याची ही वेळ आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने लेखकांसाठी ‘भारताची 75 वर्षे’ या विषयावर एका लेखन अभियानाचा प्रारंभ करण्यात आला आहे. हे अभियान सर्व भाषांमध्ये आणि सर्व राज्यांमध्ये चालविले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
कल्पक नागरिकांचे कौतुक
कोरोना उद्रेकाच्या या काळात अनेक नागरीकांनी आपल्या कल्पकतेने संकटांवर मात केली. मध्यप्रदेशातील काही महिलांनी भारताच्या गिरणीतील काम गेल्यामुळे स्वंयसाहाय्य गट तयार करून स्वतःची भातगिरणी सुरू केली. त्यांना राज्य सरकारच्या अजिविका योजनेतून अर्थसाहाय्य मिळाले. यामुळे या महिलांना कामे मिळाली आणि आता त्या गिरणीच्या लाभातून स्वतःच्या योगक्षेमाबरोबरच कजाऊची परतफेड करीत आहेत, याचा उल्लेखही त्यांनी केला.
अनेक मुद्दय़ांना स्पर्श
पंतप्रधान मोदी यांनी मन की बातमध्ये अनेक मुद्दय़ांना स्पर्श केला. यात आत्मनिर्भरता, योगप्रसार, मार्ग सुरक्षा अभियान, नव्या तंत्रज्ञानाचा लाभ, कृषी क्षेत्रातील सुधारणा, देशाच्या प्रगतीत महिलांचे योगदान, पर्यटन विकास आणि हस्तव्यासाय विकास इत्यादी मुद्दय़ांचा आवर्जून समावेश होता.
थेंबे थेंबे तळे साचे…
देशकार्यात ज्यांनी ज्यांनी त्यांचे योगदान दिले त्या साऱयांचे महत्व आपण समजून घ्यायचे आहे. थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाचे लहान मोठे योगदान देशाला समृद्ध बनवित असून याच नागरीकांच्या अथक आणि सातत्यपूर्ण योगदानाने 2021 मधील सर्व आव्हाने आपण पार करणार आहोत, असा आत्मविश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.