टिळकवाडी परिसरातील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱयांची बैठक
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावच्या गणेशोत्सवाला मोठा इतिहास आहे. गणेशोत्सव प्रतिवर्षी मोठय़ा उत्साहाने साजरा करण्याची बेळगावची परंपरा आहे. मात्र, यंदा कोरोनाचे संकट आल्यामुळे गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय टिळकवाडी परिसरातील विविध गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱयांनी मंगळवारी टिळकवाडी येथील समर्थ मंदिर सभागृहात झालेल्या बैठकीत सर्वानुमते घेतला. याप्रसंगी टिळकवाडी परिसरात येणाऱया एकूण पंधराहून अधिक मंडळांच्या पदाधिकाऱयांनी सहभाग नोंदविला होता.
यंदा संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट ओढावले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देश लॉकडाऊन केला होता. दिवसेंदिवस कोरोनाचे संकट गडद होत असल्याने नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन अनेक उपक्रम राबवित आहे. नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याबाबत विविध सूचना करत आहे. त्यामुळे येत्या काळात येणारे सर्व उत्सव-सण साधेपणाने व नियमांचे पालन करून करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. याची दखल घेऊन टिळकवाडी येथील विविध मंडळांच्या पदाधिकाऱयांची बैठक झाली. यावेळी काही मंडळांनी पाच फुटाची गणेशमूर्ती स्थापन करण्याचा निर्णय तसेच मंडपावर करण्यात येणारी रोषणाई, वर्गणी, गणेशोत्सव दरम्यान होणाऱया विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना फाटा देण्याचा निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी विविध विषयांवर चर्चा करून नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरविण्यात आले आहे.
यावेळी वेंकटेश सरनोबत, अनंत देशपांडे, उदय बी. एम., सचिन चव्हाण, राजू नाईक, उमेश नाईक, श्रीराम शिंदे, विनायक दखंदर, पवन कांबळे, उदय सावंत, अशोक जोशिलकर, अप्पू पाटील, राजू अजगावकर आदी उपस्थित होते.