महात्मा गांधींनी जगाला अहिंसेची शिकवण दिली. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गांधीजींनी अनेकदा उपोषण केले. त्यांच्या 17 उपोषणांपैकी एका उपोषणाचा कालावधी सर्वाधिक म्हणजे 21 दिवसांचा होता.
गांधीजींच्या मते अन्न
आणि पथ्याहार हे दोन्ही औषधांप्रमाणेच काम करतात. शरीर तंदुरूस्त आणि आरोग्यपूर्ण राखण्यासाठी योग्य आहार घेणे फार गरजेचे आहे.
शाकाहार सर्वात उत्तम असे गांधीजींचे मत होते. त्यातही आगीचा वापर न करता शिजवलेले अन्न त्यांना अधिक रूचायचे.
गांधीजींनी आपल्या आहाराबाबत काही प्रयोग केले होते. या प्रयोगांविषयी त्यांनी यंग इंडिया आणि हरिजन या वृत्तपत्रांमध्ये लिखाण केले होते.
या सर्व लेखांचे संकलन डाएट अँड डाएट रिफॉर्मस या पुस्तकात केले आहे. हे पुस्तक गांधी सेवाग्रामकडून प्रकाशित करण्यात आले आहे. गांधीजी देशविदेशातील आहारतज्ञांशी पत्रव्यवहार करून योग्य आहाराविषयी जाणून घेत असत.
गांधीजी सकाळी आणि संध्याकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध घालून सेवन करत असत. त्याव्यतिरिक्त त्यांच्या आहारात रोज 90 ग्रम अंकुरित गहू देखील असत. त्याव्यतिरिक्त गांधीजी दररोज 200 मिलीलीटर दूध पित असत. गांधींजींना बकरीचे दूध प्रिय होते. भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन गांधीजींना भेटले तेव्हा त्यांनाही गांधीजींनी बकरीचे दूधच प्यायला दिले होते. बकरी आणि गाय यांच्या व्यतिरिक्त नारळाचे दूधही ते सेवन करत असत.
गांधीजींच्या आहारात रोज 22 ग्रम तुपाचा समावेश असे. त्याव्यतिरिक्त त्यांच्या आहारात पेरूसारखी ताजी फळे, बदाम आणि काजू हे देखील घटक होते. 90ग्रम बदामाचा हलवा आणि 11 ग्रम आख्खे बदाम ते रोज सेवन करायचे. बदामाचे सेवन केल्याने हृदयविकार आणि मधुमेह यासारख्या अनेक आजारापासून बचाव होतो. ङया पुस्तकातील नोंदींनुसार, गांधजींनी अत्यंत दृढनिश्चयाने शाकाहार आपलासा केला होता . ते दररोज मोकळ्या हवेत व्यायाम करत असत. गांधीजींच्या मते, मन आणि शरीर यांच्यासाठी आहाराइतकाच व्यायामही आवश्यक आहे.