बेंगळूर : मृत्यू झालेल्या कोरोनाबाधितांच्या अंत्यसंस्कारासाठी समस्या निर्माण होवू नये या उद्देशाने सरकारी गायरान जमिनींवर स्मशान निर्माण करण्यास महसूल खात्याने संमती दिली आहे. यासंबंधी निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱयांना दिल्याची माहिती महसूलमंत्री आर. अशोक यांनी दिली.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या अंत्यसंस्कारासाठी सरकारी गायरान जमीन वापरता येईल. याबाबतचा अधिकार जिल्हाधिकाऱयांना असेल. गायरान जमिनी लोकवस्तीपासून 1 कि. मी. अंतरावर असतील तर तेथे तात्पुरती स्मशानभूमी निर्माण करण्याची सूचना देण्यात आली आहे, असे ते म्हणाले.