किरकोळ वाद वगळता शांततेत मतदान, जिह्यात सुमारे 82 टक्के मतदान
संवेदनशील मतदान केंद्रावर कडक बंदोबस्त, 20 रोजी होणार मतमोजणी
प्रतिनिधी/ सातारा
राज्यात झालेल्या उलथापालथीनंतर सत्ताधारी व विरोधकांनी गावपातळीवर आपली ताकद काय हे आजमावण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची केली आहे. गावकी-भावकीच्या राजकारणासाठी जिह्यातल्या 259 ग्रामपंचायतीसाठी 926 केंद्रावर मतदानाची प्रक्रिया किरकोळ वादावादीच्या घटना वगळता शांततेत रविवारी पार पडली. सकाळी मतदानाचा उत्साह होता त्यामुळे मतदानाचा टक्का चांगलाच वाढेल अशी आशा असताना सांयकाळी 5.30 वाजेपर्यत सुमारे 82 टक्क्यापर्यंत मतदान झाल्याचे ग्रामपंचायत निवडणूक विभागातून सांगण्यात आले. दरम्यान, संवेदनशील मतदान केंद्रावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी, तहसीलदारांनीही मतदान केंद्रावर भेटी दिल्या. गावावर वचक कोणाचा हे स्पष्ट करणारी ही निवडणूक मशिनबंद झाली असून आता मंगळवारी होणाऱया मतमोजणीकडे नेतेमंडळेंसह गावपुढाऱयांचे लक्ष लागून राहिले आहे.
जिह्यात ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया रविवारी पार पडली. 259 गावांमध्ये शांततेत मतदान पार पाडण्यासाठी प्रशासन अलर्ट होते. गावेच्या गावे कोणी ‘लक्ष्मीच्या पावला’ने येतेय का यासाठी रात्री उशिरापर्यंत जागे होती. पोलीस प्रशासनाच्यावतीने अशा गावांमध्ये रात्रीची गस्त घातली. पोलीस अधिकाऱयांनी रात्री 12 वाजता गावात जावून स्थानिक पुढाऱयांना आणि कार्यकर्त्यांना घरी जावून झोपण्याचे आवाहन केले. तेव्हा गावे शांत झाली. सकाळी मतदान केंद्रातील मतदान अधिकारी, कर्मचारी हे यंत्रे जोडून मतदानासाठी सज्ज झाली. गावागावातील पुढाऱयांनीच नारळ फोडून पहिला मतदानाचा हक्क बजावला. पोलीस बंदोबस्त प्रत्येक मतदान केंद्रावर लागलेला दिसत होता. मतदान केंद्राच्या 100 मीटर अंतराबाहेर गावांमधील दोन पॅनेलचे बुथ लागलेले दिसत होते. गावातले दिव्यांग, वयोवृद्ध मतदारांना आणण्यासाठी कार्यकर्ते मोठय़ा तत्परतेने पुढे होऊन त्यांना मदत करताना दिसत होते. जिह्यात किरकोळ ठिकाणी वादावादीचे प्रकार घडले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानंतर वाद मिटले. सायंकाळी मतदान झाल्यानंतर मतदान यंत्रे सुरक्षित अशी ठरवलेल्या ठिकाणी पोहचवून सिल करुन ठेवण्यात आली. दि. 20 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे त्या निकालाकडे आता सगळय़ांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
सुमारे 82 टक्के मतदान
कोरेगाव तालुक्यातील कुमठे येथील गावात दि. 15 पासून झालेल्या वादावादीमुळे पोलीस बंदोबस्त वाढवला होता. कुमठेसारख्या संवेदनशील गावांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त जाणीवपूर्वक ठेवण्यात आला होता. 259 ग्रामपंचायतीसाठी 926 मतदान केंद्रावर 4 लाख 43 हजार 319 मतदारांपैकी 2 लाख 15 हजार 604 महिला मतदार तर 2 लाख 27 हजार 712 पुरुष मतदार हक्क बजावणार होते. त्यापैकी सुमारे 82 टक्के मतदान झाल्याचे ग्रामपंचायत निवडणूक शाखेतून सांगण्यात आले. दुपारी 3.30 वाजेपर्यत 1 लाख 52 हजार 780 महिलांनी, 1 लाख 57 हजार 798 पुरुषांनी तर इतर 1 अशा 3 लाख 10 हजार 579 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
गोळेवाडीत ज्येष्ठ मतदारांनी हक्क बजावल्याने दिले गुलाबाचे फुल
गोळेवाडीत येथे मतदान केंद्रावर विष्णू हरी घोरपडे या 98 वर्षाच्या व त्यांच्या पत्नी सौ. सावित्री घोरपडे यांनी वयाच्या 85 व्या वर्षी मतदानाचा हक्क बजावला. त्याबद्दल तसेच गावातील दिव्यांग, आजारी मतदारांनी मतदान केल्याबद्दल त्यांचे गुलाब फुल देऊन निवडणूक विभागातील कर्मचाऱयांनी प्रशासनाच्यावतीने आभार मानले.
चौकट पान 1 वर घेणे
तालुकानिहाय निवडणूक झालेल्या ग्रामपंचायती व मतदानाची टक्केवारी कंसात
सातारा 29 (80), जावळी 11 (79), कोरेगाव 43 (85) वाई 7(79.88), खंडाळा 2 (75.46), महाबळेश्वर 3 (82), कराड 33 (83.14), पाटण 71(78.68), फलटण 20 (82.43), माण 28 (80), खटाव 12 (79).
आधी लगीन लोकशाहीचं…
फोटो- 18एसएटीए 28.
खंडाळा ः खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील प्रसाद निगडे यांनी विवाह बंधनापूर्वी आपला मतदानाचा हक्क बजावत आधी लगीन लोकशाहीचं हेच दाखवून दिलं. त्यामुळे विवाह सोहळ्यात मतदान केल्याची चर्चा रंगल्याचे दिसून आले. तालुक्यामध्ये शिरवळ व असवली ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. दरम्यान, प्रसाद निगडे रा. शिरवळ (जि. सातारा) अणि सिंधुदुर्ग जिह्यामधील निरोम येथील कृतिका गोलतकर याचा विवाह दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आला होता. शिरवळ येथील कै. तुकाराम कबुले मंगल कार्यालयात विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. लग्नग्नाची धावपळ सुरु असतानाही नवरदेव प्रसाद निगडे यांनी थेट मतदान केंद्र गाठले. शिरवळ ग्रामपंचायतीसाठी मतदानाचा हक्क बजावला.