यंदाही आषाढी एकादशी प्रतिकात्मक स्वरुपात : पंढरपुरात संचारबंदी : सलग दुसऱया वषीही विठोबाच्या दर्शनापासून दूरच : वारकऱयांचा हिरमोड
प्रतिनिधी /बेळगाव
लाखो वैष्णवांचे श्रद्धास्थान असणाऱया सावळय़ा विठोबाचा आषाढी एकादशीचा सोहळा आज होणार आहे. यासाठी दरवषी देशभरातून 15 लाखांहून अधिक भाविक एकवटायचे. मात्र, कोरोनामुळे सलग दुसऱया वषी आषाढी वारी प्रतिकात्मक स्वरुपात साजरी करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. त्यामुळे वारकऱयांसह भक्तांना दुसऱया वषीही आषाढी वारीपासून दूर राहावे लागले आहे. त्यामुळे वारकरी सांप्रदायातून खंत व्यक्त होत
आहे.
महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा असणाऱया आषाढीवारीसाठी बेळगाव शहर आणि ग्रामीण भागातूनही लाखो भाविक पंढरपुरात दाखल व्हायचे. परिसरातून वीस-पंचवीस दिंडय़ाही मार्गस्थ व्हायच्या. मात्र, कोरोनामुळे शासनाने दिंडय़ांना परवानगी नाकारली आहे. खबरदारी म्हणून आषाढीवारी प्रतिकात्मक पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे सलग दुसऱया वषी आषाढीवारी गावोगावी व घरोघरी साजरी होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील आजुबाजूच्या 10 गावात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे पंढरपूरच्या जवळही जाता येणार नाही. चंद्रभागेत स्नान करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे वारकऱयांचा हिरमोड झाला आहे.
गावोगावी घुमणार टाळ-मृदंगांचा नाद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱया वषी आषाढी एकादशीचा सोहळा प्रतिकात्मक पद्धतीने साजरा होत आहे. दरम्यान, या सोहळय़ासाठी पंढरपुरात वारकऱयांना व भक्तांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सलग दुसऱया वषीही गावोगावी आषाढीवारी भक्तिभावाने साजरी होणार आहे. त्यामुळे गावोगावी हरिनामाचा गजर व टाळ-मृदंगांचा नाद घुमणार आहे.
सलग दुसऱया वषी वारकरी आषाढी वारीपासून दूर
कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून वारकरी मंडळी आषाढीवारीपासून दूर राहिली आहे. काही वारकऱयांच्या अखंडितपणे सुरू असलेल्या आषाढी वारीला दुसऱयांदा ब्रेक लागला आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, मंगळवारी होणारी आषाढीवारी सर्व वारकरी व भक्तांनी गावोगावीच साजरी करावी, असे आवाहन वारकरी सांप्रदायातून केले जात आहे.
गतवषी आषाढीच्या सोहळय़ासाठी केवळ दोनशे भक्तांना परवानगी होती. मात्र, यंदा प्रत्येक संतांच्या पालखीसमवेत 40 वारकऱयांना पंढरीत प्रवेशाची मुभा दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वारकरी सांप्रदायाची परंपरा कायम ठेवून पालखी सोहळय़ाचे नियोजन केले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी आषाढीवारी प्रतिकात्मक स्वरुपात करण्यात येणार आहे. ज्या पालखी सोहळय़ांना परवानगी दिली आहे, ते बसने पंढरपुरात दाखल होणार आहेत. इतर कोणत्याही पालखी, दिंडी तसेच वारकरी व भाविकांनी आषाढीवारी कालावधीत पंढरपुरात येऊ नये, असे आवाहन केले आहे.
प्रशासनाने सुविधा उपलब्ध कराव्यात
कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण मानवजातीवर फार मोठा आघात झाला आहे. हा आघात आध्यात्मिक जगावरही झाला आहे. या महामारीमुळे भगवंताच्या दर्शनामध्ये अंतर पडले आहे. वारकरी समाज एकनि÷ भक्तीसंप्रदाय आहे. मात्र, दोन वर्षांपासून भगवंताच्या दर्शनापासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे खंत वाटत आहे. प्रशासनाने काही अंशी दर्शनासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शहापूर येथील हभप लव महाराज नार्वेकर यांनी केली आहे.
भक्तांच्या मनाची देवालाही आस
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून भगवंताचे दर्शन घेता आले नाही. भगवंताच्या दर्शनासाठी आम्हाला जशी तळमळ आहे, तशी भगवंतालाही भक्तांच्या भेटीची आस लागली आहे.
‘भेटी लागे जीवा’, लागलीसी आस, पाहे
रात्रंदिवस वाट तुझी, अशी अवस्था भक्तांची झाली आहे. देवालाही त्याच मनाची आस लागली आहे. कोरोना महामारीचे संकट दूर होईल व सर्व भक्तांना भगवंताचे दर्शन होईल, अशी आशा तुरमुरीचे हभप बाळू मारुती भक्तीकर यांनी व्यक्त केली.आहे.