राज्यसभेत विरोधी पक्ष नेते असलेले आझाद गेल्या आठवडय़ात सरतेशेवटी निवृत्त झाले तेव्हा भावुक झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आम्ही तुम्हाला निवांत बसू देणार नाही’ असे सुचवून काश्मीर खोऱयातील राजकीय वर्तुळातील चर्चा म्हणजे बाजारगप्पा नव्हत्या याची जणू पावतीच दिली. सुब्रमण्यम स्वामी यांची एक बहुचर्चित सोशल मीडिया पोस्टदेखील विरोधी पक्षांनी संसदेत वापरून सरकारवर टीकेची तोफ डागली.
कधी कधी सत्य हे कल्पितापेक्षा अद्भुत असते असे म्हणतात. गेला महिनाभर जम्मू आणि काश्मीरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते की माजी मुख्यमंत्री आणि जे÷ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना देशातील कोणत्याही भाजपशासित राज्यामधून राज्यसभेवर आणण्याची ओपन ऑफर सत्ताधाऱयांनी दिली आहे. आझादसाहेब यांनी ही ऑफर विनम्रपणे नाकारली असेही सांगितले जात होते.
राज्यसभेत विरोधी पक्ष नेते असलेले आझाद गेल्या आठवडय़ात सरतेशेवटी निवृत्त झाले तेव्हा भावुक झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आम्ही तुम्हाला निवांत बसू देणार नाही’ असे सुचवून काश्मीर खोऱयातील राजकीय वर्तुळातील चर्चा म्हणजे बाजारगप्पा नव्हत्या याची जणू पावतीच दिली. वादग्रस्त 370 कलम हटवल्याने जम्मू आणि काश्मीर आता केवळ एक केंद्रशासित प्रदेश झाला असला तरी आज ना उद्या तिथे निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. त्यावेळी मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपकडे चेहरा नाही. अशावेळी आझाद यांच्यासारखा सर्वांशी मिळून मिसळून राहणारा आणि राजकीयदृष्टय़ा तोळामासाच नेता अनायासे गळाला लागला त र भाजपला हवा आहे. ज्या आझाद यांची सारी राजकीय हयात गांधी घराण्याच्या दरबारात सेवा करण्यात गेली त्यांना सहज ‘गुलाम’ बनवता येईल हा हिशोब मोदी आणि अमित शहा यांनी केला असणार अशी चर्चा भाजपच्या गोटातदेखील दबक्मया आवाजात सुरू आहे. ‘लालकृष्ण अडवाणीच्या दयनीय अवस्थेमुळे मोदींना गेल्या सहा वर्षात कधीही पाझर फुटलेला बघितलात का?’ हा एका राहुल निष्ठावंताचा सवाल म्हणजे पंतप्रधान नक्राश्रू ढाळण्यात पटाईत आहेत हेच सांगण्याचा भाग आहे. मोदींच्या राष्ट्रीय स्तरावर झालेल्या उदयानंतर अडवाणी, मुरली मनोहर जोशी अशा जे÷ नेत्यांना बळजबरीने निवृत्तच केले गेले आहे.
गुलाम नबी आझादना पुढील उपराष्ट्रपती?
अडवाणींना राष्टपती बनवले जाईल अशी काही भाबडय़ा लोकांची अपेक्षा होती पण चार वर्षांपूर्वी मोदी-शहा यांनी वेगळेच राजकारण खेळले हे जगाने बघितले. राज्य सभेत सरकारला मदत करण्यासाठी आता गुलाम नबी आझादना पुढील उप राष्ट्रपती देखील बनवले जाऊ शकते अशी चर्चा आहे. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात. वेंकय्या नायडू पुढील वषी निवृत्त होत आहेत. नायडू हे महत्त्वाकांक्षी आहेत आणि त्यांचा राष्ट्रपती पदावर डोळा आहे.
शाहनवाज हुसेन मंत्री
गेल्या आठवडय़ात घडलेली एक गमतीशीर गोष्ट म्हणजे अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारात कॅबिनेट मंत्री राहिलेले भाजपचे जे÷ प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांना सहापेक्षा जास्त वर्षे खासदारकी आणि केंद्रीय मंत्रिपदाची वाट पहायला लावल्यावर बिहारमध्ये मंत्री बनवले गेले आहे. 2004 साली काँग्रेस केंद्रात सत्तेवर आल्यावर शाहनवाज यांनी भाजपच्या पराभवाकरता मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना तिथे 2002 मध्ये झालेल्या दंग्यांना जबाबदार धरले होते. तेव्हापासून शाहनवाज यांना मोदींनी एक प्रकारे ‘कंडम’ फाईलीत टाकले होते.
एका दगडात दोन पक्षी
आझाद यांच्या नथीतून राहुल गांधींवर तीर सोडण्याचा डाव मोदी-शहा करू शकतात याची काँग्रेसला जाणीव आहे. ‘राहुल गांधी यांचे शत्रू ते आमचे मित्र’ असे भासवून त्यांना काँग्रेसअंतर्गत वणवा पेटवायचा आहे.
नेतृत्वाच्या प्रश्नावर सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱया काँग्रेसमधील 23 असंतुष्टांचे आझाद हे म्होरके आहेत. आझाद यांना काँग्रेसकडून परत राज्यसभा मिळणार नाही अशी कल्पना करून दिल्यानंतरच त्यांनी बंडाचे निशाण उभारले होते हे न समजायला काँग्रेसी दूधखुळे नाहीत. आझाद यांच्या त्या बहुचर्चित पत्रानंतर झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत आपले विरोधक हे भाजपच्या ओंजळीने पाणी पीत आहेत असा राहुलनी केलेला जाहीर आरोप चुकीचा नव्हता हेच मोदींच्या गेल्या आठवडय़ातील आझाद प्रेमाने दाखवले आहे.
शेतकऱयांच्या आंदोलनाबाबत बचावात्मक पवित्रा
बऱयाचशा प्रसारमाध्यमांना हाताशी धरूनदेखील सरकारला शेतकऱयांच्या आंदोलनाबाबत बचावात्मक पवित्रा घ्यावा लागत आहे हे संसदेतील चर्चेच्यावेळी दिसून आले. लोकसभेतील चर्चेत भाग घेताना भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी चीन या आंदोलनाला खतपाणी घालत आहे असा आरोप केला खरा पण हे ‘परदेशी हात’ प्रकरण कोणीच उचलून धरले नाही. याउलट तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा यांचे आक्रमक भाषण फार गाजले. भारताच्या एका वादग्रस्त मुख्य न्यायाधीशाला सत्ताधारी पक्षाने राज्यसभेत कसे बरे आणले असा सवाल उपस्थित करून मोदी पंतप्रधान झाल्यापासून संविधानिक संस्थांचे पद्धतशीर खच्चीकरण सुरू आहे असा आरोप त्यांनी लावला.
सुब्रमण्यम स्वामी यांची एक बहुचर्चित सोशल मीडिया पोस्टदेखील विरोधी पक्षांनी संसदेत वापरून सरकारवर टीकेची तोफ डागली. ‘श्रीरामाच्या भारतात पेट्रोल 93 रु. लिटर, सीतामाईच्या नेपाळमध्ये मात्र फक्त 53 रु. लिटर तर रावणाच्या लंकेत 51 रु. लिटर असे स्वामींनी म्हटले आहे. त्यांचे नाव न घेता विरोधी सदस्यांनी भाजपचे समर्थक अशी टीका करणाऱया माणसाला देशाबाहेर जायला का सांगत नाही अशी पृच्छा केली.
अखिलेश यांचा गौप्यस्फोट
उत्तर प्रदेशचे माजी मुख्य मंत्री अखिलेश यादव यांनी पंतप्रधान लोकसभेत ज्या वाराणसीचे प्रतिनिधित्व करतात तिथेदेखील शेतकऱयाना हमी भाव मिळत नाही असा गौप्यस्फोट केला.
सुनील गाताडे