प्रतिनिधी/ गुहागर
लॉकडाऊनमुळे तालुक्यात अडकलेल्यांचा घरी जाण्याचा प्रवास सुरू झाला आहे. ऑनलाईन अर्ज केलेल्यांपैकी 9 मे रोजी 49जण बुलढाणा, लातूर व साताऱयाला रवाना होणार आहेत. या 49जणांची यादी गुहागर आगाराकडे प्राप्त झाली असून आवश्यक भाडे भरल्यानंतर शनिवारी दुपारी व सायंकाळी बसेस सोडण्यात येणार आहेत.
तालुक्यातून आपल्या गावी जाणाऱयांनी ऑनलाईन अर्ज भरलेल्यांपैकीपहिली यादी जिल्हाधिकारी कार्यालयातून गुहागर तहसील कार्यालयाला प्राप्त झाली आहे. यानुसार बुलढाणा, लातूर व सातारा अशा तीन ठिकाणी 3 बसेस सुटणार आहेत. यात बुलढाण्याचे 21 , लातूरचे 20, तर सातारा येथील 8 प्रवाशांच समावेश आहे. सुरक्षेविषयी योग्य खबरदारी घेतल्यावर या बसेस सोडण्यात येणार आहेत.
44 रूपये प्रतीकिलोमिटरने धावणार बसेस
एसटी प्रशासनाकडून ग्रुप बुकिंगकरिता प्रतीकिलोमिटर 66 रूपये भाडे आकारले जाते, परंतु लॉकडाऊन काळातील सुविधेसाठी हा दर 44 रूपये असल्याची माहिती आगारप्रमुख वैभव कांबळे यांनी दिली. एका बसमध्ये कमाल 22 प्रवासी मर्यादा आहे. गुहागर आगारातून शनिवारी साताऱयाकरिता सकाळी 11 वा., सायं. 5 वा. लातूर तर सायं. 6 वा. बुलढाणासाठी गाडय़ा सोडण्याचे नियोजन आहे.
गुहागरात 41जण संस्थात्मक क्वारंटाईन
गुहागरमध्ये संस्थात्मक क्वारंटाईनची 41 ही सर्वाधिक संख्या शुक्रवारी नोंद झाली आहे. तालुक्यातील वेळणेश्वर येथे संस्थात्मक क्वारंटाईन करून ठेवलेल्यांमध्ये स्वॅब घेऊन रिपोर्टच्या प्रतीक्षेत असलेले पूर्वीचे 16 जण, तर गुरूवारी हैद्राबाद येथून 17 व खेड येथे अडवून त्यांचे स्वॅब घेऊन गुहागरमध्ये पाठवण्यात आलेले 8जण अशा एकूण 41जणांना संस्थात्मक क्वारंटाईन करून ठेवण्यात आले आहे.