मुक्त गोव्यात असल्याचा झाला साक्षात्कार : रहिवाश्यांच्या प्रतिक्रिया,तीन कोटी खर्चून पेवर्स रस्ता बांधकाम
उदय सावंत/बंदीरवाडा सत्तरी.
गोवा मुक्त होऊन जवळपास आठ वर्षे पूर्ण झाली. गावामध्ये येण्यासाठी धड रस्ता नाही. पाण्याची कमतरता यामुळे नागरी सुविधांचा अभाव त्याच्या पार्श्वभूमीवर आपण विकसित गोमंतकाध्येच खरेच राहतो का, असा प्रश्न निर्माण होणे साहजिकच होते. रस्ता नसल्यामुळे गावाच्या विकासाला चालना मिळत नव्हती. आरोग्याच्या समस्या जर्जर प्रमाणात सर्व नागरिकांना भोगावे लागत होते. यामुळे आमच्या गावाचा रस्ता होणार तरी कधी अशा असंख्य पडणाऱया प्रश्नांना आता पूर्णविराम मिळाला आहे. सावर्डे पंचायत क्षेत्रातील साटेली, बंदीरवाडा,काझरेघाट यातीन गावात जाण्यासाठी जवळपास तीन कोटी खर्चून व्यवस्था करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
सदर काम जवळपास पन्नास टक्के पूर्ण झालेले आहे. यामुळे सदर गावात फेरफटका मारला असता या गावातील नागरिकांच्या व खासकरून विद्यार्थ्यांच्या तोंडावर हास्य निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
काझरेघाट,बंदीरवाडा,साटेली गावात रस्ता होणार
काझरेद्याट, बंदिरवाडा व साटेली या तीन गावांचा समावेश सावर्डे पंचायत क्षेत्रात आलेला आहे. गावांचा समावेश म्हादई अभयारण्याच्या क्षेत्रात करण्यात आलेला आहे . यामुळे 1999 पासून या गावाच्या विकासाची दारे खुली होण्याऐवजी त्यांना कुलूप पडले. या गावांमध्ये रस्ता व्हावा यासाठी गेल्या 60 वर्षांपासून प्रयत्न करण्यात येत आहेत, मात्र या प्रयत्नांना यश आले नव्हते.
विश्वजित राणे यांचे प्रयत्न
विश्वजित राणे यांनी राजकीय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर या गावाच्या नागरिकांची कथा व व्यथा ऐकून घेतली व या गावांमध्ये रस्ता करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्याला अनुसरून गेल्या दहा वर्षापासून यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. सदर परिसर हा पूर्णपणे अभयारण्य क्षेत्रात येत असल्यामुळे त्यांचा ना हरकत दाखला घेण्यासाठी बरेच प्रयत्न लागले. शेवटी हा दाखला प्राप्त झाल्यानंतर जवळपास तीन कोटी खर्चून या रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे.
5 कि.मी चा रस्ता
सदर रस्ता जवळपास पाच किलोमीटर अंतराचा आहे. यामुळे तीन कोटी खर्च करण्यात येणार आहेत. या रस्त्यावर डांबरीकरणाऐवजी मजबूत पेव्हर्स घालून हा रस्ता तयार करण्याचे काम सुरू झालेले आहे . सध्यातरी पन्नास टक्के काम पूर्ण झालेले आहे. पावसाळय़ापूर्वी हा रस्ता पूर्ण करण्याच्या प्रयत्नात कंत्राटदार युद्धपातळीवर काम करीत असल्याचे चित्र पहावयास मिळाले.
कृष्णापूर भागामुळे गाव प्रकाशझोतात
थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित होत असलेल्या कर्नाटक भागातील कृष्णापूर या गावातील वाढत्या आकर्षणामुळे गोव्यातील ही तीनही गाव प्रकाशझोतात आलेली आहेत. दर दिवशी व खास करून सुट्टीच्या दिवशी मोठय़ा प्रमाणात पर्यटक कृष्णापूर भागांमध्ये सहलीसाठी जातात .यामुळे या गावाला नवीन अशी ओळख निर्माण झालेली आहे. आता हा रस्ता तयार करण्यात येत असल्यामुळे पर्यटकांची चांगल्याप्रकारे सोय होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे जवळपास पंधरा किलोमीटर पैकी पाच किलोमीटरचा रस्ता हा पूर्णपणे चांगल्या स्थितीत निर्माण होणार असल्यामुळे पर्यटकांना एक चांगला फायदा होणार असल्याचे समजते.
28 वर्षे हलाखीचे जीवन जगले
माझे लग्न होऊन जवळपास 28 वर्षे झाली. वडिलांच्या मर्जीनुसार आपण लग्नासाठी तयार झाले. हा भाग कधी बघितला नव्हता.मात्र या भागांमध्ये लग्न करून आल्यानंतर एक प्रकारचे संकट आपल्यासमोर उभे राहिली अशी भावना निर्माण झाली. घनदाट जंगल सासरवाडीला जाण्यासाठी रस्ता नाही. पावसाळय़ात तर अत्यंत भयानक समस्या. या पार्श्वभूमीवर आता आपले कसे होणार अशा अनेक प्रकारच्या समस्यांनी माझ्या डोक्मयावर समस्यांचे डोंगर उभे राहिले. गेल्या जवळपास वीस वर्षापासून डोक्मयावरचे ओझे अजिबात कमी झाले नाही .अशा अवस्थेत विश्वजित राणे हे या भागाचे आमदार बनल्यानंतर या गावाच्या विकासाची दारे खुली होणार असल्याचे चिन्हे दिसू लागली. सर्वप्रथम पाण्याची सोय करण्यात आली आणि आता नवीन रस्ता होत असल्यामुळे या गावाच्या विकासाची दारे आता खऱया अर्थाने खुली होणार असल्याची भावना महिला भगिनी लक्ष्मी डोईफोडे यांनी व्यक्त केलेली आहे.
पावसाळी मोसमामध्ये या भागात गाडी येत नाही. या भागातील मुलांना शिक्षणासाठी सावर्डे किंवा खडकी या ठिकाणी जावे लागते. मात्र पाच किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे पायदळी तुडवावा लागतो. भर पावसामध्ये प्रचंड प्रमाणात समस्या मुलांसमोर उभ्या राहतात. यामुळे पालकांसमोर मोठय़ा प्रमाणात चिंता निर्माण होत असते. रस्ता होणार असल्यामुळे समस्या कायमस्वरूपी दूर होणार अशी चिन्हे आहेत. यामुळे विश्वजित राणे यांनी या भागांमध्ये सकाळी व दुपारी प्रवासी बसेसची सोय करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
सरकारचे आभार मात्र काम लवकर पूर्ण करा.–विद्यार्थीनी.
संपूर्ण शिक्षण हे पायदळी तुडवीत पूर्ण केले. दररोज शाळेला जात असताना या गावाचे कसे होणार, असा प्रश्न निर्माण होत होता .आता मात्र रस्त्याची सोय अंमलात येत असल्यामुळे समाधान वाटत आहे .चांगल्या प्रकारचा रस्ता आमच्या गावात येत आहे ही आमच्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट असल्याचे प्रतिक्रिया या भागातील सुशिक्षित युवती प्रतीक्षा नाईक यांनी व्यक्त केलेली आहे. सध्या रस्त्याचे काम धिम्यागतीने सुरू आहे .पावसापूर्वी हे रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास या पावसाळय़ापासून नागरिकांना चांगल्या प्रकारची सोय उपलब्ध होणार असल्याचे यावेळी त्यांनी व त्यांच्या सोबत असलेल्या सहकारी तरुणीनी व्यक्त केल्या.
या रस्त्यासाठी भगिरथ प्रयत्न झाले
या भागाचे पंचायत सभासद नारायण गावकर यांनी यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना हा रस्ता पूर्णत्वास यावा यासाठी सरकार पातळीवर मोठय़ा प्रमाणात भगीरथ प्रयत्न करण्यात आले. यासाठी विश्वजित राणे यांनी वेळोवेळी सहकार्य दिले व त्यांच्यामुळेच जवळपास तीन कोटी खर्चून पाच किलोमीटर रस्त्याचे काम आता पूर्णत्वास येणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. या रस्त्यामुळे गावाला एक वेगळय़ा प्रकारची ओळख निर्माण होणार आहे. या गावांमध्ये नैसर्गिक स्तरावर विपुल जंगल संपत्ती आहे. यामुळे येणाऱया काळात टेकिंगसाठी व निसर्ग सहलीसाठी ही गावे पर्यटकांच्या नकाशावर येणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. पाण्याची सोय झालेली आहे. रस्त्याची सोय आता पूर्णत्वास येणार आहे. यामुळे येणाऱया काळात वेगवेगळय़ा प्रकारच्या सुविधा हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर होणार असल्याचे यावेळी ते म्हणाले.
विकासाला चालना मिळणार : गंगाराम डोईफोडे
या भागामध्ये प्रत्यक्ष प्रमाणात खास करून बंदीरवाडा भागामध्ये धनगर समाजाची मंडळी राहत आहेत .यामुळे काबाडकष्ट करून गेल्या शेकडो वर्षापासून ही मंडळी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. रस्ता नसल्यामुळे गावाच्या विकासाला अडथळा निर्माण झाला होता . सत्तरी हा एक मतदारसंघ होता त्यावेळी या मतदारसंघाचे नेतृत्व करणारे प्रतापसिंह राणे यांनी या गावांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी मोलाचे सहकार्य दिले . त्यांचे चिरंजीव विश्वजित राणे यांनी या गावाला तीन कोटी खर्चून रस्त्याची सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले व त्यावेळेचा विकास व आताचा विकास यामध्ये कशाप्रकारे फरक पडला यात जमीन आसमानचा फरक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.