विकास करणारे सरकार विरोधकांना सत्तेवर नको : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे सांखळीत टीकास्त्र,ढवळीकरांमुळे रस्त्यांची स्थिती दयनीय
प्रतिनिधी /डिचोली-सांखळी
आज सुरू असलेली विकासकामे आणि अंमलात आणण्यात आलेल्या योजनांमुळे हे भाजप सरकार आज गोव्याच्या कानाकोपऱयात प्रसिद्ध होत आहे. लोकांचा विश्वास या सरकारवर वाढत असल्याचे पाहून आज विरोधकांच्या पोटातली जळजळ शमत नसल्यानेच आज सर्वच विरोधी नेते सरकारवर तुटून पडत आहेत. भाजप सरकार विरोधात वातावरण करताना यापुढे भाजपला सत्तेवर आणू नका म्हणून सांगतानाच आज सर्व विरोधी पक्ष भाजपविरोधात एकत्रित येण्याची भाषा करीत आहेत. एकत्रित येऊन केवळ गोव्याची आणि सरकारच्या तिजोरीची लुट करण्याचे त्यांचे मनसुबे आहेत. मात्र या सरकारवरील विश्वास आणि विरोधकांचे नकारात्मक मनसुबे गोव्यातील जनता ओळखून आहे. म्हणूनच येणाऱया निवडणुकीत गोव्याची जनता पुन्हा भाजपला सत्तास्थानी विराजमान करणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांखळी येथे व्यक्त केला.
सांखळी सरकारी महाविद्यालयात आयोजित ‘सरकार तुमच्या दारी’ या कार्यक्रमाचा उद्घाटनाचा कार्यक्रम रवींद्र भवनच्या मुख्य सभागृहात पार पडला. यावेळी प्रधान वित्त सचिव पुनीत कुमार गोयल, महसूल सचिव संजय कुमार, उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी मामू हागे यांची उपस्थिती होती. उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर, मामलेदार प्रवीणजय पंडित यांच्या नेतृत्वाखाली सर्वं अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
रस्त्यांची दयनीय अवस्था सुदिन ढवळीकरांमुळे
राज्यात सध्या निर्माण झालेली रस्त्यांच्या दयनीय अवस्थेला माजी मंत्री सुदिन ढवळीकर जबाबदार आहेत. त्यांनी या मंत्रीपदी राहून केवळ स्वार्थच साधला. आपण मुख्यमंत्री या नात्याने राज्यातील प्रत्येक घराला 16 हजार लीटर पाणी मोफत देण्याची घोषणा करताच सदर योजना आपण तत्परपणे देणार होतो, असे बोलणारे ढवळीकर आज मंत्री असते तर लोकांना तेही मिळाले नसते. कारण पाणी पुरवठय़ातही झालेल्या हलगर्जीपणाला आज आपल्या सरकारला सामोरे जावे लागत आहे. आता म्हणे ते रथयात्र काढणार आहेत. रथयात्रा काढण्यापूर्वी मंत्री म्हणून स्वतः किती स्वार्थ साधला याचा हिशोब जनतेला द्यावा, अशी टीका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी केली.
दिगंबर कामत.. अजूनही वेळ गेलेली नाही!
आज सरकारची प्रसिद्धी आणि लोकांचा या सरकारप्रती वाढत चाललेला विश्वास पाहून बरेच राजकारणी सरकारवर आणि आपल्यावरही टीका करीत आहेत. कोण मडगावातून टीका करतो, कोण फातोडर्य़ातून टीका करत आहे. ज्या पक्षाकडे आज राज्यात आणि केंद्रातही नेतृत्व नाही. ज्या पक्षाने आमदार, मंत्री, खासदार, मुख्यमंत्री बनविले आणि मोठे केले त्याच पक्षाला सोडचिठ्ठी देऊन नेते इतर पक्षाशी हातमिळवणी करीत आहेत. त्यासाठी लोक आता त्या पक्षासोबत राहणार नाहीत हे निश्चित आहे. म्हणूनच आज आपण दिगंबर कामत यांना सांगू इच्छीतो.. ‘की वेळ अजूनही गेलेली नाही..!’ या मुख्यमंत्र्यांच्या विधानावरून दिगंबर कामत यांना त्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपमध्ये येण्याची ऑफरच दिली की काय अशी चर्चा मात्र या कार्यक्रमानंतर बरीच रंगली.
‘सरकार तुमच्या दारी’ हा उपक्रम
सांखळीचे आमदार तथा मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी या युवा नेत्याने मार्च 2019 मध्ये गोवा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली आणि अल्पावधीतच जनतेला सुशासन देण्यासाठी विविध उपक्रमाची सुरवात केली. याचाच एक भाग म्हणून ‘सरकार तुमच्या दारी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम केवळ समाजातील दुर्लक्षित घटकाला सरकारी सोयींचा लाभ मिळवून देण्यासाठी आहे. हा उपक्रम म्हणजे निवडणूक स्टंट नाही. या उपक्रमाद्वारे गोव्याच्या कानाकोपऱयात राहणाऱया जनतेपर्यंत सरकारी अधिकारी विविध कल्याणकारी योजना तसेच सुविधा उपलब्ध करून देतील. या कार्यक्रमात सरकारची 40 विविध खाती आणि वरिष्ट ते कनिष्ट अधिकारी सहभागी झाले होते. डिचोली तालुक्मयातील हा दुसरा कार्यक्रम असून या पाळी, सुर्ला, आमोणा, कुडणे, वेळगे, हरवळे, न्हावेली, सांखळी नगरपालिका इत्यादी परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला
सांखळीतील जनतेमुळेच सर्व काही शक्य
राज्यात एकही माणूस सरकारी योजनेपासून वंचित राहू नये, प्रत्येकाला राहायला घर असावे, प्रत्येक अपंग व्यक्तीचा सन्मान व्हायला हवा, मुलभूत सुविधापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी आपले सरकार काम करत आहे. आपण इतर राज्यावर अवलंबून न राहता स्वतंत्र व्यवसाय स्थापन करून स्वयंपूर्ण होणे आवश्यक आहे. कोरोना काळात आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचाऱयांनी चांगले काम केले आहे. राज्यात सर्व सरकारी अधिकारी खूप चांगले काम करीत असून ते अभिनंदनास पात्र ठरतात. आता पर्यंत मी केलेले कार्य हे सर्व सांखळीतील जनतेमुळे शक्मय झाले असल्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सांगितले. उद्घाटन कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांखळी मतदारसंघातील कुडणे, नावेली, सुर्ल, पाळी, वेळगे, हरवळे, आमोणा या सातही पंचायतींच्या स्वयंपूर्ण मित्र आणि सरपंचांशी संवाद साधला. त्यांनी आपापल्या पंचायतींमध्ये केलेल्या कामांचा आढावा घेऊन समस्याही ऐकून घेतल्या. व आवश्यक सूचनाही केल्या.