दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांचे मत
प्रतिनिधी / पणजी
गोव्याचा कायापालट करण्यासाठी प्रामाणिक आणि दूरदृष्टी असलेल्या राजकारण्यांची गरज आहे. दिल्लीत ज्याप्रमाणे लोक काँग्रेस, भाजपला पूर्णपणे विसरले तशीच स्थिती गोव्यातही एक दिवस असेल असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी दै ‘तरुण भारत’ला दिलेल्या सदिच्छा भेटीवेळी बोलताना सांगितले. यावेळी त्यांनी वृत्तपत्र कर्मचाऱयांशी दिलखुलास चर्चा केली. समुह संपादक किरण ठाकुर यांच्या हस्ते शाल श्रीफळ व मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान झाला यावेळी निवासी संपादक सागर जावडेकर, लोकमान्य सहकारी संस्थेचे विभागीय व्यवस्थापक प्रियोळकर व इतर पदाधिकारी हजर होते.
गोव्यात सत्ताधारी आणि विरोधकांची येवढी हातमिळवणी आहे की विरोधी पक्षच राहिलेला नाही त्यामुळे सत्ताधाऱयांची अरेरावी आणि त्यामुळे सत्ताधाऱयांची अरेरावी आणि भ्रष्टाचार वाढला आहे असे ते म्हणाले.
एका पक्षाच्या उमेदवारीवर निवडून यायचे आणि नंतर दुसऱया पक्षात प्रवेश करायचा हा प्रकार पैशाची देवाण घेवाण झाल्याशिवाय घडू शकतो का? अशी टिपणी करताना पक्षाशी निष्ठावान राहाणारे राजकारणी तर पाहिजेच त्याहीपेक्षा भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीशी संबंध नसलेला स्वच्छ राजकारणी हवा असा पूर्ण कायापालट गोव्यात होऊ शकतो असे त्यांनी सांगितले.
कोऱया पाटीने सुरवात
गोवा लहान राज्य आहे आणि आम आदमी पक्षही लहान पक्ष आहे. गोव्यात हा पक्ष कायापालटाची दृष्टी ठेऊन प्रवेश करतोय. एक कोरी पाटी गोमंतकीयासमोर आहे त्यांना काय हवे ते त्यावर लिहितील प्रत्येकाकडे दिल्ली मॉडल राबवायलाच हवा असे नाही गोव्यात अशी प्रगती घडवू की गोव्याचे उदाहरण दुसरीकडे द्यावे लागावे असे ते म्हणाले.
दिल्लीत महिलांना बसमधून मोफत प्रवासाची सोय आहे. वीज आणि पाणी मोफत दिले जाते त्यामुळे प्रत्येक कुटुंबियाकडे बचत होते या बचतीतून ते काही वस्तू खरेदी करतात त्याचा परिणाम अर्थकारणावर पडतो सरकारला महसूल तर मिळतोच पण अनेकांचे उद्योग व्यवहार जोमाने चालू झाल्याचे दिसून आले आहे त्यामुळे लोकांकडे बचत वाढत जाईल यासाठी काय करता येईल यावर दिल्ली सरकार भर देत असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारकडून अपेक्षा
एका सामान्य माणसाला जर सरकारकडून अपेक्षा कारायला सांगितली तर तो सर्वप्रथम आपल्याला चांगले वेतन देणारी नोकरी कामधंदा पाहिजे. स्वःताच्या मालकीचे घर पाहिजे मुलाबाळांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे चांगली आरोग्य सेवा मिळाली पाहिजे. अशा स्वःताबद्दलच्या मागण्या झाल्यानंतर रस्ते, उद्योग व इतर सुविधांकडे माणूस वळतो त्यामुळे आप सरकारने या सामान्य माणसाच्या गरजांना प्राधान्यही त्यांच्याच क्रमवारीने द्यायला सुरवात केली. प्रत्येकाला नोकरी व्यवसाय मिळणार. एकाही व्यक्ती बेकारीची शिकार होणार नाही.
रोजंदारीचा खर्च भागून त्यांच्याकडे थोडीतरी बचत होईल येवढी मिळकत त्याची होईल याकडे सरकार लक्ष देत आहे. प्रत्येकाला घर देण्याची योजना आखत आहे. सरकारी शाळा आणि आरोग्य केंद्र येवढी चांगली केली की त्यांना तक्रार करण्यासाठी जागा ठेवलेली नाही.
पैशामुळे कामे अडत नाहीत.
प्रत्येक राज्याकडे भरपूर पैसा असतो पैशामुळे कामे अडूच शकत नाहीत. फक्त चांगली मानसिकता पाहिजे. प्रत्येकजण कुठल्याना कुठल्या पद्धतीने कर देतच असतो हा कर गोळा करतानाच कधी कधी गळती लागते. कराच्या स्वपात गोळा केलेला निधी खर्च करताना परत चोरी होते. ही दोन्ही टोकांकडे बारकाईने लक्ष ठेवल्यावर दिल्ली सरकारकडे येवढा पैसा झाला की अनेक सुविधा मोफत दिल्या जाऊ शकतात. पैशामुळे कामे अडू शकत नाही फक्त दुरदृष्टी चांगली ठेवली पाहिजे असे ते म्हणाले.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया गोव्यात खासगी भेटीवर असून त्यांनी कोणतीच पोलीस सुरक्षा घेतलेली नाही. पणजीतील एका गोमंतकीय हॉटेलात जावून त्यांनी सकाळी नाष्टा घेतला. तिथे काहीजणांनी त्यांना ओळखले व त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. गोव्यातील जनता परिवर्तनाच्या प्रतिष्ठेत आहे. स्वच्छ राजकारण खेळून आम आदमी पक्ष गोवेकरांच्या इच्छा पूर्ण करणार असे सिसोदिया यांनी जाहीर केले.