प्रतिनिधी/ बेळगाव
ग्रामीण भागातील विजेची समस्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. शनिवारी कडोली परिसरात अचानक वीजपुरवठा ठप्प झाला. कोणतीही पूर्वकल्पना न देता वीजपुरवठा काढण्यात आल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. तब्बल 5 तासांच्या प्रतीक्षेनंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. यामुळे कडोली परिसरातील विजेची समस्या केव्हा दूर होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
कडोली गावासोबतच परिसरातील अगसगा, केदनूर, मन्नीकेरी, बंबरगा, कट्टणभावी, हंदिगनूर, कुरिहाळ, बेडकेनहट्टी, म्हाळेनट्टी, चलवेनहट्टी, जाफरवाडी या परिसरात नेहमीच विजेच्या समस्या आहेत. वारंवार वीजपुरवठा ठप्प होत असल्याने लघु उद्योजक मेटाकुटीला आले आहेत. आधीच लॉकडाऊनपासून व्यवसाय मंदावलेला असताना आता या विजेच्या समस्येने व्यवसाय कसा करावा, असा प्रश्न लहान उद्योगांसमोर आहे.
शनिवारी सकाळी 7 च्या सुमारास अचानक वीज गायब झाली. पूर्वसूचना न देता वीजपुरवठा बंद झाल्याने महिलांना तारेवरची कसरत करावी लागली. लाईट केव्हा येणार याची वाट पाहिली जात होती. कामानिमित्त बाहेर जाणाऱयांना याचा फटका बसला. हेस्कॉमच्या कर्मचाऱयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. परंतु त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने लाईट येईपर्यंत वाट पाहावी लागली. अखेर सकाळी 11 च्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
थ्री फेज विजेअभावी शेतकरी अडचणीत
तालुक्मयात सुगीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. आता उन्हाळी पिकांची तयारी करण्यात येत आहे. रब्बी हंगामात कडोली तसेच तालुक्मयाच्या इतर परिसरात भाजीपाला व इतर पिके घेण्यात येतात. भाजीपाला, बटाटा, कोबी यासह इतर पिके घेण्यात येणार आहेत. परंतु थ्री फेज विद्युत पुरवठा नियमित नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. सध्या दुपारी 12 ते सायंकाळी 6 या वेळेत वीजपुरवठा करण्यात येत असला तरी तो नियमित नसल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.