कोरोनामुळे जिल्हय़ात सोमवारी पहिल्या दिवशीची स्थिती : 44.93 टक्केच शाळांचे उघडले दरवाजे : पालकांकडून संमतीपत्रे देण्यास आखडता हात
प्रतिनिधी / रत्नागिरी
कोरोनाचे संकट कायम…तरीही शासनाच्या आदेशानुसार सुमारे सव्वा पाच महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सोमवारपासून जिह्यातील शाळांचे दरवाजे उघडलेत…कोरोना प्रतिबंधासाठी शाळेत योग्य ती खबरदारी घेण्यात आलीय… 2932 शिक्षकांच्या कोरोना चाचण्या झाल्यात… शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात आलेय… मात्र प्रत्यक्षात सोमवारी जिल्हय़ातील 454 पैकी 204 शाळा उघडल्या…तर 9 ते 12 इयत्तांमधील एकूण 82,096 विद्यार्थ्यांपैकी फक्त 7,917 विद्यार्थ्यांनीच शाळेत हजेरी लावली. त्यामध्ये उत्तर रत्नागिरीत बऱयापैकी तर दक्षिण रत्नागिरीत अगदीच नगण्य प्रतिसाद लाभला आहे.
रत्नागिरी जिह्यातील 23 नोव्हेंबर रोजी फक्त 44.93 टक्केच शाळा अखेर सोमवारपासून सुरु झाल्या आहेत. मात्र कोरोनाच्या धोक्यामुळे असलेली भिती लक्षात घेत अनेक पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास असहमती दर्शवली आहे. जिह्यात 9 वी ते 12 वीचे विद्यार्थी 82,069 संख्या आहे. जिह्यातील सुमारे 2 हजार 281 विद्यार्थ्यांना पालकांनी मुलांनी शाळेत येण्यासाठी हरकत नसल्याचे संमतीपत्र दिली आहेत. कोरोना पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिह्यातील शाळांनी खबरदारी घेत शाळा सुरू केल्या आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत येताना मास्क अनिवार्य आहे.
बहुतांश पालकांनी ऑनलाइनचा पर्याय निवडला आहे. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा शिक्षकांचीच संख्या अधिक होती. शाळेत येणाऱया विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था एका बेंचवर एकच अशी करण्यात आलेली आहे. महाविद्यालयांमध्ये देखील अशीच व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. सरकारने जे नियम घालून दिलेले आहेत, त्या नियमांचे पालन करून शाळा सुरू केल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या कमी दिसत असली तरी येत्या काही दिवसात 100 टक्के उपस्थिती दिसेल, असे माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी सांगितले. तसेच शाळेत येणाया प्रत्येक विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी करूनच त्यांना प्रवेश दिला जात आहे.
जिल्ह्य़ातील 9 ते 12 पर्यंतच्या विद्यार्थी उपस्थितीची आकडेवारीः
तालुका विद्यार्थी उपस्थिती
- मंडणगड 616
- दापोली 547
- खेड 738
- चिपळूण 1229
- गुहागर 1672
- संगमेश्वर 1648
- रत्नागिरी 86
- लांजा 916
- राजापूर 462
जिल्हय़ात सोमवारी सुरू झालेल्या शाळांची संख्याः
मंडणगड-24, दापोली-11, खेड-35, चिपळूण-32, गुहागर-29, संगमेश्वर-22, रत्नागिरी-29, लांजा-13, राजापूर-9, एकूण 204 शाळा.
प्रशासनाने शाळांबाबत फेरविचार करावा : उदय सामंत
राज्यासह जिह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांने स्वत:सह इतरांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. गेल्या आठ महिन्यात सर्व धर्मियांनी आपले सण निर्बंध पाळून साजरे केले. त्याचप्रमाणे कार्तिकी एकादशीला नागरिकांनी गर्दी करु नये. शाळा सुरु झाल्या असल्या तरी मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालक उत्सूक नाहीत. त्यामुळे प्रशासनाने शाळांबाबत फेरविचार करावा अशी सुचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे. सोमवारी कोरोनाचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकार परिषेदेत बोलत होते. राज्य शासनाच्या आदेशाने 9 ते 12 वी पर्यंत शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र विद्यार्थ्यांची उपस्थिती अत्यल्प आहे. पालकांमध्ये कोरोनाची भीती आहे. विद्यार्थी शाळेत येणार नसेल तर शाळांबाबत जिल्हा प्रशासनाने योग्य निर्णय घेण्याच्या सुचना नामदार सामंत यांनी प्रशासनाला केल्या आहेत.