हंदिगनूर ग्राम पंचायतीचा आंधळा कारभार
प्रतिनिधी /बेळगाव
अतिवृष्टीमुळे हंदिगनूर ग्राम पंचायत क्षेत्रामध्ये येणाऱया बोडकेनहट्टी गावामधील अनेकांची घरे कोसळली. त्यानंतर त्यांनी रीतसर अर्ज केले. मात्र घर कोसळलेल्यांना नुकसान भरपाई देण्याऐवजी श्रीमंत व ज्यांचे बंगले आहेत त्यांनाच घरे मंजूर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकाऱयांना निवेदन देवून तातडीने या प्रकरणाची चौकशी करून घरे कोसळलेल्यांना घरे द्यावीत, अशी मागणी केली आहे.
मागील वषी पूर आला होता. त्यामुळे जवळपास काही जणांची घरे कोसळली होती. त्यांना नुकसान भरपाई मिळालीच नाही. मात्र दोन बंगले असलेल्यांनाच नुकसान भरपाई दिली गेली आहे. 5 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यासाठी 50 हजार रुपये आकारले जात आहेत, असा आरोप देखील ग्रामस्थांनी केला आहे. हंदिगनूर ग्रा. पं. च्या या कारभाराविरोधात आता जनता वैतागली असून तातडीने त्यांच्यावर कारवाई करावी व गरिबांना घरे बांधण्यासाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी केली आहे. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संतोष नौकुडकर, शेट्टू नाईक, अंजना गिऱयाण्णावर, यल्लव्वा मरकट्टी, शोभा नाईक, गौरव्वा नाईक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.