प्रतिनिधी / बेळगाव
राणी चन्नम्मा विद्यापीठातील मराठी विभागात ‘आझादी का अमृतमहोत्सव’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाल्याबद्दल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. विनोद गायकवाड म्हणाले, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, स्वातंत्र्याचा आनंद कर्तव्यभावनेतून घेतला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे यांनी केले. कला शाखेच्या अधिष्ठाता डॉ. मनीषा नेसरकर, मैजुद्दीन मुतवल्ली यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी सुधाकर जोगळेकर, संतोष मादाकाचे, महादेव खोत, तेजस्विनी कांबळे, पल्लवी कदम यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. संजय कांबळे यांनी केले.