प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील कचऱयाची उचल आणि गटारींची स्वच्छता व्यवस्थित होत नसल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. चव्हाट गल्ली परिसरातील गटारींची स्वच्छता केली जात नसल्याने त्या स्वच्छ करण्याची वेळ रहिवाशांवर आली आहे. हॉटेल कीर्ती पाठीमागील गल्लीतील गटारी कचऱयाने तुंबल्या आहेत.
शहरातील कचऱयाची उचल करण्याबाबत नेहमीच तक्रारी होत असतात. तरीही कचऱयाची उचल वेळेवर होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. कचऱयाची उचल आणि गटारींची स्वच्छता करण्यासाठी वर्षाकाठी 25 ते 30 कोटींचा निधी खर्ची घातला जात आहे. तरीदेखील स्वच्छता होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. शहराच्या विविध भागात कचऱयाची उचल व्यवस्थित होत नाही. गटारींमध्ये साचलेला कचरा काढण्यास टाळाटाळ केली जात आहे. परिणामी सांडपाण्याचा निचरा होत नाही. परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. गटारीमधील बाजूला काढलेला कचरा महिना उलटला तरी उचलला जात नाही. परिणामी तो पुन्हा गटारीत पडून राहतो. यामुळे हा कचरा स्वच्छ करण्याची वेळ रहिवाशांवर आली आहे. हॉटेल कीर्ती मागील चव्हाट गल्लीतील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गटारी तुंबल्याने नागरिकांना धोकादायक बनले आहे. आजारांमुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. यामुळे येथील स्वच्छतेचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे.