वारणानगर / प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसापासून पावसाने उघडीप घेतल्याने वसंत सागर या चांदोली धरणातून वारणा नदीच्या पात्रात होणारा विसर्ग २० हजार क्वेससने कमी करण्यात आला आहे. यामुळे महापूराची पातळी ओसरू लागल्याने वारणा काठच्या गांवाना दिलासा मिळाला आहे.
चांदोली धरणातून वारणा नदीच्या पात्रात सद्या ८ हजार २१५ क्यूसेस विसर्ग सुरू आहे.
गुरुवार दि. २२ रोजी सहा हजार क्यूसेसचा असलेला विसर्ग दुपारपासून ढगफुटीच्या पाऊसाने नदीपात्रात प्रचंड वेगाने वाढत असलेल्या पाणी साठ्यामुळे रात्री ८ वा.२२ हजार क्यूसेसने सुरू केलेला विसर्ग शुक्रवार दि. २३ रोजी २८ हजारावर क्यूसेसने सुरू होता.दि. २४ रोजी पाऊसाचे प्रमाण कमी आल्याने २८ हजार क्यूसेसने सुरू असलेला विसर्ग १४ हजार क्यूसेसवर आणला होता आज रविवार दि. २५ रोजी चांदोली धरणातील विसर्ग ८ हजार ७२० क्यूसेसने सुरु करून पाटबंधारे विभागाने २० हजार क्यूसेसने वीसर्ग कमी केला आहे.
धरणातून मोठ्या प्रमाणात नदी पात्रात झालेला पाण्याचा विसर्ग व चार दिवस झालेली अतिवृष्टी त्यामुळे वारणा खोऱ्याला महापुराने वेढले आहे. या पुराने आजवरचे सर्वच रेकॉर्ड तोडले आहे. प्रचंड नुकसान झालेल अनेक गांवाना बेटाचे स्वरूप आले बचाव कार्य सुरू आहे पाऊसाने विश्रांती घेतली तरी अधून मधून हलक्या सरी पडत आहेत धरण क्षेत्रात ८६ मि.मी. पाऊस पडला असून या वर्षात आजपर्यन्त १९६३ मि.मी. पाऊस पडला आहे.