ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्रिय मंत्री आणि आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी चायनीज पदार्थांवरही बहिष्कार टाकत, विक्री करणाऱ्या सर्व हॉटेल्सवर बंदी घालण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
सोमवारी चीनने भारतावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 20 जवान शहीद झाले होते. यामुळे देशात सर्व स्तरावरून चीनी वस्तूंवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. कॅटकडून तर 500 चिनी वस्तूंवर बंदी घातली जावी अशी मागणी करण्यात आली आहे.
त्यातच आता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘गो कोरोना गो’ चा नारा देणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी चायनीज पदार्थ खाऊ नका असे आवाहन जनेतेला ट्विट द्वारे केले आहे.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, चीन धोका देणारा देश आहे. त्यामुळे चीनमधील सर्व वस्तूंवर तसेच विशेषतः चायनीज पदार्थांवर बहिष्कार घाला आणि चायनीज पदार्थ खाऊ नका, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.