ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चालू वर्षात भारताने 3.75 दशलक्ष टन साखरेची निर्यात करण्यात येणार आहे. यासाठी साखर कारखान्यांना मान्यता देण्यात आली आहे. अशी माहिती ऑल इंडिया शुगर टेड असोसिएशनचे अध्यक्ष प्रफुल विठ्ठलानी यांनी रॉयटर्ससोबत चर्चा करताना दिली आहे. तर आतापर्यंत 3.75 दशलक्ष टनापैकी आतापर्यंत 2.86 दशलक्ष टन साखरेची निर्यात करण्यात आल्याचे विठ्ठलानी यांनी दिलेल्या माहितीमधून सांगण्यात आले आहे.
चालू वर्षात देशातील 4.3 दशलक्ष टन ते 4.5 दशलक्ष टन इतकी साखर निर्यात होणार असल्याचा अंदाज विठ्ठलानी यांनी व्यक्त केला आहे. या अगोदर साखर उद्योगाशी संबंधीत असणाऱया एका अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार 23 मार्च रोजी 4.5 दशलक्ष टन साखर निर्यात होण्याचे अनुमान व्यक्त केले आहे.
मुख्य देशांमध्ये निर्यात
देशातील साखर प्रामुख्याने इराण, सोमालिया, मलेशिया आणि श्रीलंका आदी देश मोठय़ा प्रमाणात आपली साखर खरेदी करीत असतात असेही स्पष्टीकरण यावेळी विठ्ठलानी यांनी दिले आहे.
लॉकडाउनमुळे समस्या वाढली
देशात केंद्र सरकारने कोरोनाला थोपवण्यासाठी 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली आहे. यामुळे कामगारांची निवडकच संख्या आहे. यामुळे साखरेची चढउतार आणि अन्य साहित्यांची देवाणघेवाण करण्यात मोठय़ा अडचणी निर्माण होत असल्याचे शुगर असोसिएशनने सांगितले आहे.
व्यापारी वर्ष 2019-20 मधील साखर निर्यात
सरकारकडून मिळणाऱया प्रोहत्सानापर देशातील चालू व्यापारी वर्षात (ऑक्टोबर ते सप्टेंबर 2019-20) या कालावधीत 28.68 लाख साखरेची निर्यात करण्यात आली आहे. आखिल भारतीय साखर व्यापारी संघाच्या माहितीनुसार साखर कारखान्यांनी साखर हंगामात ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीत 28,68,533 टन साखर निर्यात करण्यात आली आहे. भारतात 58 देशांमध्ये ही निर्यात करण्यात आली आहे. साखरेची 65 टक्के निर्यात इराण, सोमालिया, मलेशिया, श्रीलंका आणि अफगाणिस्ताण या देशांना केली आहे. एआयएसटीच्या माहितीनुसार साखर कारखान्यांनी आतापर्यंत 38 लाख टन साखरेची निर्यात केल्याचे म्हटले आहे. सरकारकडून 2019-20 या कालावधीत 60 टक्क्मयांपेक्षा अधिकची साखर निर्यात करण्यासाठी मान्यता दिली होती.