जलसंपदा’च्या अधीक्षक अभियंता वैशाली नारकर यांची माहिती
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जुलै महिन्याच्या 22-23 तारखांना अतिवृष्टी झाली आणि त्यानंतर पूर आल़ा या पुरामध्ये पाण्याने गाठलेल्या उच्चतम पातळीची नोंद घेण्यात आली आह़े सध्या नोंदवण्यात आलेल्या लाल रेषेच्या जवळपासच ही नोंद आह़े त्यापेक्षा अधिक प्रमाणात पूर आल्याची नोंद नाही, असे जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता वैशाली नारकर यांनी सांगितल़े
त्या म्हणाल्या, यावर्षी जुलै महिन्यात पर्जन्यमान मोठे होत़े ठराविक तासात ढगफुटीसारखा पाऊस पडल़ा विशिष्ट एखाद्या तालुक्यात अतिवृष्टी झाली, असे नाह़ी तर रत्नागिरी जिह्याच्या सर्वच तालुक्यात अतिवृष्टी झाल़ी यामुळे पाणी साठून राहण्यासाठी कोठेही जागा शिल्लक नव्हत़ी यामुळे मोठा पूर आल़ा त्या पुढे म्हणाल्या, चिपळूणच्या पुराची कमाल पातळी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी तपासली आह़े ही पातळी 100 वर्षातून एकदा येणाऱया पुरासारखी आह़े यापूर्वी पूररेषा लाल रंगाने चिन्हीत करण्यात आली आह़े लाल रेषेच्या आसपास यावर्षीच्या पुराची नोंद आह़े त्यापेक्षा अतिरिक्त प्रमाणात पूर आलेला नाह़ी या नोंदीमुळे चिपळुणातील लाल रेषेत बदल करणे आवश्यक वाटत नाह़ी
पंचवीस वर्षातून एकदा येणारा कमाल पूर निळ्य़ा रेषेने नोंदवला जात़ो या क्षेत्रातील बांधकामांच्या सुरक्षेसाठी काही नियमन करावे लागेल़ त्यासाठी अभियांत्रिकी उपाययोजना सूचवल्या जातील़ तळमजळ्यावर केवळ वाहने उभी करून ठेवण्याची जागा यासारखे उपाय सूचवण्यात येतील़