नवी दिल्ली / वृत्तसंस्था
लडाख सीमेपासून जवळ चीनने नवे बंकर्स बांधले असल्याचे वृत्त प्रसारित होत आहे. मात्र ही बाब गंभीर नसून भारताच्या सेनेचे चीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष आहे, असे स्पष्टीकरण भारताच्या विदेश व्यवहार विभागाने दिले आहे.
काही वृत्त माध्यमांमधून चीनच्या नव्या हालचालींसंबंधी वृत्त प्रसारित करण्यात आले आहे. तथापि, चीनची हालचाल ही नवी असून 10 वर्षांपासून अधिक काळापासूनच चीनने बांधकाम करण्यास प्रारंभ केला होता. मात्र, आता या बांधकामांना भारतीय सेना विरोध करीत आहे. भारतानेही आपल्या सीमेच्या संरक्षणासाठी आवश्यक ती बांधकामे केली असून चीनच्या तोडीस तोड तयारी केली आहे. त्यामुळे चिंतेचे कोणतेही कारण नाही. चीनच्या कोणत्याही हालचाली हाणून पाडण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, असे सेना प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.