दोन दिवसानंतर आगरवाडा-चोपडे पंचायतील दुकाने पूर्ण बंद ठेवणार
मोरजी / प्रतिनिधी
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामळे शनिवार ड13प़ासून चोपडे येथे रस्त्यावर भरणारे मासळी मार्केट काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक पंचायतीने घेतला त्याची अंमलबजावणी शनिवार पासून करण्यात येणार आहे त्या संबंधीचा तोंडी आदेश शुक्रवारी पंचायत मंडळाने मासळी मार्केट मद्धे फिरून मासळी विपेत्यांना सांगितला आणि उद्यापासून मासळी मार्केट बंद ठेवण्यास सांगितले आहे .
दरम्यान 15 जून पासून आगरवाडा –®ााsपडे गावातील सर्व दुकाने काही काल बंद ठेवण्याचा निर्णयही पंचायत मंडळ घेणार असून त्यासाठी शनिवार 13 जून रोजी सकाळी पंचायत कार्यालयात पंचायत मंडळाची बैठक बोलावण्यात आली असल्याचे सरपंच प्रमोद गावकर यांनी सांगितले
यावेळी सरपंच प्रमोद गावकर ,उपसरपंच सौ.समिता अमोल राऊत ,पंच भगीरथ गावकर ,पंच नितीन चोपडेकर ,पंच सौ.संगीता गुरुदास नाईक सौ.प्रमोदिनी प्रमोद आगरवाडेकर,पंच सौ.नीलम अनिल शेटय़े मसुरकर आदी उपस्थित होते.यासंदर्भात बोलताना सरपंच प्रमोद गावकर म्हणाले .चोपडे पुलाजवळ हमरस्त्यावर कोरोनाच्या काळात मासळी बाजार भरवला जात होता सामाजिक अंतराचे पालन करता यावे म्हणून चोपडे येथील मासळी मार्केट मध्ये भरणारा हा बाजार गेले दोन –तीन महिने रस्त्यावर भरत होता त्यामुळे रस्यावर वाहने उभी करून ग्राहक मासळी घेत असल्याने वाहतुकीस अडथला होत होता त्यात सामाजिक अंतर पाळण्याच्या नियमाचे सर्वांकडून उल्लंघन होताना दिसत होते मासळी मार्केट मध्ये येणारे मासळी विपेते ,ग्राहक यांच्या मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याने अखेर कोरोनाच्या प्रादुर्भावाची शक्मयता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पंचायत मंडळाला नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागल्याचे सरपंच श्री गावकर म्हणाले तरी मासळी विपेत्यांनी तसेच लोकांनी सहकार्य करावे कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात राहिल्यास आठवडाभरानंतर पुन्हा पंचायत मंडळाची बैठक बोलावून यासंदर्भात पुढील निर्णय घेण्यात येईल तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावाची भीती सर्वांनाच असल्याने आगरवाडा –®ााsपडेतील दुकाने काही काळ बंद ठेवण्याचा विचार पंचायत मंडळ करीत असून त्याबाबत अंतिम निर्णय उद्या होणार्या पंचायत मंडळाच्या बैठकीत घेण्यात येईल यात जीवनावश्यक वस्तूच्या आस्थापनांना वगळण्याचा विचार असून नागरिकांच्या सूचना लक्षात घेवूनच गावातील नागरिकांच्या हिताचा निर्णय पंचायत मंडळ घेणार असल्याचे श्री गावकर म्हणाले
दरम्यान आगरवाडा गावात मुंबई येथील एक कुटुंब शनिवारी सकाळी आपल्या घरी राहण्यास आल्याने गावात भीतीचे वातावरण आहे मात्र सरकारच्या नियमानुसार या कुटुंबातील सर्व सदस्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून खबरदारी म्हणून त्यांचे घरीच विलीगीकरण करण्यात आले आहे वैद्यकीय अहवाला नंतर या कुटुंबाबत पुढच्या निर्णय घेण्यात येणार आहे सध्या या कुटुंबातील 4 ही सद्सयाना इतरापासून दूर ठेवण्यात आले आहे आणि त्या संदर्भात पंचायत मंडळाने योग्य ती खबरदारी घेतली आहे त्यामुळे कुणीही घाबरू नये असे स्थानिक पंच सौ.नीलम शेटय़े-मसुरकर यांनी सांगितले