वार्ताहर / निवृत्ती हारकारे :
चंदगड तालुक्मयाच्या पूर्व भागाला वरदान ठरलेला जंगमहट्टी मध्यम प्रकल्प गुरूवार दि. 6 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 7 वाजता पूर्ण क्षमतेने भरला आहे. सांडव्यावरून पाणी होनहाळ नाल्यात पडत असल्याने प्रकल्प शंभर टक्के भरल्याचे जाहीर करण्यात आले आहे. धरण पाणलोट क्षेत्रात सकाळी संपलेल्या 24 तासांत विक्रमी 255 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी 84 टक्के इतका भरलेला प्रकल्प गुरुवारी सकाळी 100 टक्के भरला आहे.
हा प्रकल्प भरल्याने जंगमहट्टी सह माडवळे, तुर्केवाडी, मुरकुटेवाडी, मजरे कारवे, यशवंतनगर, मौजे कारवे, मांडेदुर्ग, गौळवाडी, ढोलगरवाडी या लाभक्षेत्रातील गावांचा शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघाला आहे. त्याचबरोबर किणी कर्यात भागातील बहुतांशी गावे या प्रकल्पावर अवलंबून आहेत. या सर्व गावांच्या ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजना सुरळीतपणे वर्षभर चालणार आहेत. जून-जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्याने समस्त शेतकरी व नागरिकांचे या प्रकल्पाकडे लक्ष लागून राहिले होते. 1.22 टीएमसी इतकी क्षमता असलेल्या या प्रकल्पावर आधारित सर्व घटक सुखावले आहेत. 34.65 दशलक्ष घनमीटर एवढी या प्रकल्पाची क्षमता आहे. गेल्या वषी हा प्रकल्प 31 जुलै 2019 रोजी पूर्ण क्षमतेने भरला होता. यावषी सहा दिवस वेळाने प्रकल्प भरला आहे. धरण पाणलोट क्षेत्रात आज अखेर 1721 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सांडव्यावरून पाणी होणहाळ नाल्याच्या नदीपात्रात जात असल्याने व मुळातच मुसळधार पावसाने होणहाळ नाल्यातील पाणी पात्राबाहेर असल्याने पावसाचे प्रमाण वाढल्यास गेल्यावषीप्रमाणे महापूर येण्याची शक्मयता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे कोवाड परिसरासह नदीकाठच्या गावांना व शेतकऱयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.