मुंबई
गेल्या सात वर्षांच्या कालावधीत जनधन खाती 43 कोटी इतकी झाली आहेत. या अंतर्गत या खात्यांमध्ये 1.46 लाख कोटी रुपये जमले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. प्रधानमंत्री जनधन योजना सात वर्षापूर्वी सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या खातेदारांच्या जीवनात बदल झाला असून त्यांचे जीवनही सुधारले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 28 ऑगस्ट 2014 मध्ये योजनेला सुरुवात झाली.