मुंबई
पंतप्रधान जनधन योजना (पीएम जेडीवाय) खात्यांची संख्या 40 कोटीच्या वर पोहचली असून सदर खात्यांमध्ये एकूण 1.30 लाख कोटी रुपये जमा झाल्याची माहिती सरकारच्या एका विभागाने ट्वीटच्या माध्यमातून दिली आहे.
जनधन योजनेचा प्रारंभ हा 6 वर्षाच्या अगोदर मोदी सरकारच्या कार्यकाळात करण्यात आला आहे. यात शुन्य बॅलेन्सची सुविधा देण्यात आली असून एकूण 40.5 कोटी खाती मागील 6 वर्षात उघडण्यात आली आहेत.
बँकिंग सुविधा
28 ऑगस्ट 2014 रोजी प्रारंभ करण्यात आलेल्या पीएम जनधन योजनेची सहावी वषीपूर्ती लवकरच साजरी करण्यात येणार असल्याचे ट्वीटच्या आधारे सांगितले आहे. या योजनेचा उद्देश देशातील बँकेची सुविधा घरोघरी पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्टीकरण केले आहे. सदर योजनेला गती देण्यासाठी सरकारने 2018 मध्ये अपघात विमा संरक्षण देण्यास प्रारंभ केला आहे. यात 2 लाख रुपयाचे विमा संरक्षण देण्यात येणार आहे.